File photo 
मराठवाडा

आडातच नाही, तर पोहऱ्यात कुठून येणार...काय ते वाचलेच पाहिजे

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्याला दरवर्षीच जानेवारी महिन्यापासूनच भीषण पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. शहरात रोज येणारे नळ अवेळी येत असल्याने, पाण्याची पूर्तता करण्यासाठी नागरिकांची आत्तापासून चांगलीच धावपळ सुरू आहे. 

शहरासह जिल्ह्यातील काही भागांमध्ये जानेवारी महिन्यापासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यंदा जानेवारीतच पाणीपातळी खालावली आहे. प्रकल्पांतही अत्यल्प जलसाठा आहे. जानेवारी महिन्यातच ही परिस्थिती ओढवल्याने पुढे एप्रिल, मे महिन्यात पाणी मिळावे, यासाठी शहरात बोअरवेल करण्याचा सपाटा सुरु आहे. दररोज प्रत्येक प्रभागामध्ये किमान चार ते पाच बोअरवेल करताना दिसून येत आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात जमिनी पोखरल्या जात आहेत. मात्र, दोनशे ते तीनशे फूट खोल बोअर खोदूनही अनेकांच्या घरी पाणी लागत नाही ही वस्तुस्थिती आहे. 

भविष्यात पाण्यासाठी करावी लागणार कसरत
रात्रंदिवस बोअरवेल खोदण्याचे काम सुरु असल्याने शेजारी राहणाऱ्या नागरिकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागतो आहे. ही वेळ आपल्यावर का आली, याचे उत्तरही मानवाकडे आहे. मानवी गरजांच्या पूर्ततेसाठी हजारो हेक्टर जंगले नष्ट होत आहेत. विकासाच्या नावाखाली सर्रास वृक्षतोड सुरु आहे. त्यामुळेच दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी होत आहे. पावसाचे पाणी अडविले जात नाही. त्यामुळे भूगर्भातील पाणीपातळी खालावली आहे. कितीही खोल बोअरवेल केले तरी पाणी कसे लागत नाही? पाणी हेच जीवन आहे, भविष्यात आणखी कसे दिवस येतील याचा विचार न केलेलाच बरा, अशा प्रतिक्रिया नागरिकांतून परखडपणे व्यक्त होताना दिसत आहे.

मांत्रिकांची चंगळ
खोलवर खोदूनही पाणी लागत नसल्याने नागरिक मांत्रिकांकडून पाणी तपासणी करून घेत आहेत. याचा प्रत्यय रतननगरमध्ये आला. एका ग्रहस्थाकडे बोअरवेल घेणे सुरु होते. तत्पूर्वी त्याने मांत्रिकाला बोलावले. त्याला ५०० रुपये देऊन हातावर नारळ ठेवले. हातातील नारळ हलले की त्या जागेवर पाणी हमखास लागते, असे तो सांगत होता. नारळ हलले आणि बोअर घ्यायला सुरुवात झाली. साडेतीनशे फुटवर बोअर गेली तरी पाणी लागले नाही. त्यामुळे पाण्याच्या नावाखाली मांत्रिकांची चंगळ सुरु असल्याचे वास्तव यातून समोर आले आहे.

अंधश्रद्धेला बळी पडू नये
नारळ हातावर ठेवताना विशिष्ट पद्धतीने ठेवले जाते. बोटांचे खडे, आधार मिळाला की नारळ उभे होते. यामागे कुठलीही दैवीशक्ती नाही. पाणी तपासण्याच्या नावावर नागरिकांची सर्रास लूट होत आहे. पाणी लागणे ही
भौगोलिक रचनेवर आहे. त्यामुळे नागरिकांनी अंधश्रद्धेला बळी पडू नये.
- शिवाजी देशपांडे (अंधश्रद्धा निर्मूलन समिती)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane Price : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकारकडून उसाच्या किमतीत वाढ, आता एका क्विंटलमागे किती रुपये मिळणार?

World Cup 2025, IND vs ENG: भारताला पराभूत करत इंग्लंडने मिळवलं सेमीफायनलचं तिकीट! हरमनप्रीत कौर-स्मृती मानधनाची झुंज व्यर्थ

Worli Fire: वरळीत भीषण आग! अनेक झोपड्या जळाल्या, आगीमागचं नेमकं कारण आलं समोर

Pune Fire : सदाशिव पेठेतील चव्हाण वाड्याला भीषण आग, चार घरांचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली

World Cup 2025, INDW vs ENGW: दीप्ती शर्माने घडवला इतिहास! 'असा' पराक्रम करणारी भारताची पहिलीच महिला क्रिकेटपटू

SCROLL FOR NEXT