संग्रहित छायाचित्र 
मराठवाडा

नागपूरला 25, औरंगाबादची केवळ पाच कोटींवर बोळवण

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - महापालिकेची हद्दवाढ होऊन चार वर्षे उलटल्यानंतर राज्य शासनाला जाग आली असून, सातारा-देवळाई भागासाठी केवळ पाच कोटींचा निधी देऊन बोळवण करण्यात आली आहे. दुसरीकडे नागपूर शहराला मात्र तब्बल 25 कोटी रुपये देण्यात आले आहेत. 

महापालिकांची हद्दवाढ झाल्यानंतर नव्याने समाविष्ट झालेल्या भागासाठी राज्य शासन निधी दिला जातो. वर्ष 2016 मध्ये सातारा-देवळाई नगरपालिका बरखास्त करून हा भाग महापालिकेत समाविष्ट करण्यात आला होता. त्यानंतर या भागात पाणी, ड्रेनेज, पथदिवे, रस्ते अशा मूलभूत सुविधा देण्यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपयांचे डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) शासनाला सादर केले आहेत; मात्र यासंदर्भात अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी नगरविकास विभागाने राज्यातील हद्दवाढ झालेल्या महापालिकांसाठी विशेष अर्थसाह्य योजनेअंगर्तत 30 कोटींचा निधी वितरित करण्यासंदर्भात आदेश काढले आहेत. त्यात औरंगाबाद शहरासाठी फक्त पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दुसरीकडे नागपूर शहरासाठी 25 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे सुमारे 35 ते 40 हजार मालमत्ता असलेल्या सातारा-देवळाई भागात पाच कोटींतून कोणती कामे करायची असा प्रश्‍न महापालिका प्रशासनासह पदाधिकाऱ्यांना पडला आहे. 

कोट्यवधी रुपयांची मागणी 
महापालिकेने सातारा-देवळाईच्या विकासासाठी सुमारे पाचशे कोटी रुपयांची मागणी करणारे प्रस्ताव शासनाकडे पाठविले आहेत. त्यात शहराच्या पाणीपुरवठा योजनेतच सातारा-देवळाईचा समावेश करावा, अशा सूचना शासनाने देत महापालिकेला दिलासा दिला. उर्वरित कामांसाठी निधीच नसल्याने या भागातील नागरिकांची फरपट सुरू आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Decision about World Cup: भारत विश्वविजेता झाल्याच्या पाच दिवसांतच ‘ICC’ने विश्वचषकाबाबत घेतला मोठा निर्णय!

India Pakistan Conflict: पाकिस्तान खरंच अणुचाचण्या करतंय का? संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मांडली भारताची भूमिका

MahaBiz Summit : राज्यातील उद्योजकांना मिळणार जागतिक संधींचे व्यासपीठ ‘जीएमबीएफ’ व ‘एमईडीसी’ यांच्या संयुक्त विद्यमाने दुबईत ‘महाबिझ’चे आयोजन

Mahar Vatan Land Scam : मुंढवा येथील जमीन गैरव्यवहारानंतर खळबळ; 'महार वतन जमिनी बळकावणाऱ्यांची सीबीआय चौकशी करा' महार वतन परिषदेची मागणी

Pune Traffic : सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पुलावर रिक्षा-कारचा तिहेरी अपघात! मोठी वाहतूक कोंडी, नागरिक हैराण

SCROLL FOR NEXT