osmanabad loksabha election sakal
मराठवाडा

Loksabha Election 2024 : उस्मानाबाद लोकसभेच्या निवडणुकीत विकासात्मक चर्चेवर उमेदवाराचे मौन

सर्वच राजकीय पक्षांच्या नेतृत्वाने थातूरमातुर विकासाचा बागुलबुवा उभा केला परंतु तालुक्याचा सिंचनाचा व उद्योगाचा अनुशेष शून्यवत आहे.

दिलीप गंभिरे

कळंब - लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या अगदी स्थानिक पातळीवरील कोणत्याही निवडणुकीत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि राणाजगजितसिंह पाटील कुटुंबियांकडून शिळ्या कढीला ऊत आणून' निवडणुकीचा प्रचार करण्यात येत असल्याने यांच्या प्रचारला मतदार वैतागले आहेत. विकासात्मक, रोजगार, पाणी टंचाई यावर उमेदवाराचे मौन कधी सुटणार असा प्रश्न जनता विचारत आहे.

कळंब तालुक्याचा विकासाचा अनुशेष अजूनही कायम असून, जनप्रतिनिधी विकासासाठी कोणत्याही योजना आणत नसल्याचे चित्र आहे. तालुक्यात सिंचन वाढवून शेतकरी सुखी करावयास हवा. शेतकरी जोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या खालोखाल आपले जीवनमान जगू शकणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र समृद्ध होणार नाही.

सर्वच राजकीय पक्षांच्या नेतृत्वाने थातूरमातुर विकासाचा बागुलबुवा उभा केला परंतु तालुक्याचा सिंचनाचा व उद्योगाचा अनुशेष शून्यवत आहे. तालुकानिहाय सर्वच क्षेत्रातील अनुशेष पूर्ण करण्यासाठी कुठलाही प्रयत्न अथवा सर्वेयुक्त नियोजन व त्यावरची अंमलबजावणी कुठेच आढळून येत नाही.

ना उद्योग आले,ना रोजगार मिळाला

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने एमआयडीसी स्थानिकांना रोजगार आणि उद्योगांना चालना मिळावी, असा धोरणात्मक हेतू ठेवून एमआयडीसीने या जागेचे भूखंड विविध कर व सवलतींसह जागा उपलब्ध करून उद्योगासाठी जागा हस्तांतरीत केल्या. येथील एमआयडीसीमध्ये ना उद्योग आले ना नव्याने रोजगार निर्माण झाला, अशी तालुक्याची भीषण सद्यस्थिती आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आल्यास उद्योगनगरी म्हणून ओळख निर्माण होऊन बेरोजगारी कमी होईल. असा भविष्यातील विचारावर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मौन पाळले आहे.

वैयक्तिक चिखलफेकीचा प्रचार जोरात

उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीसह या अगोदर झालेल्या सहकार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हेच उमेदवार हेच नेतृत्व यामुळे बेरोजगार, पाणी, वीज टंचाई, सिंचन व्यवस्था नसल्याने शेतकरी भरडला जातोय. शिळ्या कढीला ऊत आणून वैयक्तिक चिखलफेक करून प्रचाराची तोफ डागली जाते. स्थानिक प्रश्नांना बगल देवून शेतकरी, बेरोजगारांना वाऱ्यावर सोडण्याचे काम झाले.

पाणी प्रश्न गंभीर

तालुक्यात पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. घोटभर पाण्यासाठी नागरिकांची फरफट सुरूच आहे. तत्कालीन सरकारने टँकर मुक्त महाराष्ट्राची घोषणा केली होती. आजही तालुक्यातील गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, भाजप अशा प्रमुख पक्षाच्या नेतृत्वाने पाणी टंचाई सारख्या गंभीर प्रश्नावर ठोस निर्णय घेतलेच नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT