Paithan Panchayat Samiti  Sakal
मराठवाडा

Paithan : प्रशासनाचा भोंगळ कारभार ; पैठण पंचायत समितीत तब्बल मागील १३ वर्षांपासून एकही आमसभा झाली

परिणामी नागरिकांच्या समस्यांच्या निराकरणाचा संवैधानिक दुवा तुटला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पैठण : विविध विकासकामांचा आढावा घेणे, नागरिकांच्या समस्या व प्रश्नांना वाचा फोडून त्यावर उपाययोजना करण्यासाठी आमसभा होणे आवश्यक आहे. मात्र, पैठण पंचायत समितीत तब्बल मागील १३ वर्षांपासून एकही आमसभा झाली नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे आमसभा पंचायत समिती प्रशासनाच्या नोंदीतून गायब झाली आहे. परिणामी नागरिकांच्या समस्यांच्या निराकरणाचा संवैधानिक दुवा तुटला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पंचायत समिती कार्यालय हे ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. पंचायत समितीशी नागरिकांची नाळ जुळलेली असते. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे व्यासपीठ म्हणून पंचायत समितीच्या आमसभेकडे पाहिले जाते. नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे काम अधिकाऱ्यांचे आहे. मात्र, अधिकाऱ्यांकडून समस्यांचे निराकरण झाले नाही तर आमसभा हा एक वैधानिक मार्ग आहे. पंचायत समितीस्तरावर अनेक विभाग कार्यरत आहेत.

प्रत्येक विभागातील कामांचा दरवर्षी आमसभेच्या माध्यमातून आढावा घेणे आवश्यक आहे. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लांबणीवर पडत आहे. त्यामुळे पंचायत समितीमध्ये सभापती, उपसभापती व सदस्य हे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे नागरिकांची कामे अधिकारी व कर्मचारी करीत नसल्याच्या तक्रारी जनतेतून होत आहे. त्यामुळे आमसभा घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांवर उरला नाही वचक!

नियमित आमसभा झाल्यास प्रलंबित समस्या मांडता येतात. संबंधित लोकप्रतिनिधींकडून कानउघाडणी होण्याची भीती अधिकाऱ्यांमध्ये असते. त्यामुळे प्रलंबित प्रश्न आमसभेच्या अगोदरच निकाली काढू शकतात. मात्र, पैठण पंचायत समितीची आमसभा होत नसल्याने ग्रामीण भागातील जनतेची मोठी अडचण निर्माण झाली आहे. दरम्यान, पंचायत समितीचे बीडीओपद ही गेल्या एक वर्षांपासून प्रभारी असल्यानेही याकडे लक्ष देण्यात येत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकांच्या समस्या मांडण्यासाठी आमसभा एक व्यासपीठ असते. मात्र, पैठण पंचायत समितीत अनेक वर्षांपासून आमसभा होत नसल्याने हे खुले व्यासपीठच बंद झाले आहे. समस्यांना वाचा फोडण्यासाठी वर्षातून किमान दोन आमसभा झाल्या पाहिजेत.

- माऊली मुळे,जिल्हा युवा जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना,पैठण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT