parbhani  sakal
मराठवाडा

Parbhani : कर्जबाजारी पणाला कंटाळून शेतकऱ्यांची आत्महत्या; जिंतूर शहरातील घटना

यावर्षी पाऊस कमी पडल्याने विलास रोकडे यांच्या शेतातील सोयाबीन पिकाच्या उत्पादनात मोठी घट झाली.

राजाभाऊ नगरकर.

जिंतूर शहरातील पाटील विहीर परिसरात एका ४५ वर्षीय शेतकऱ्याने सततची नापिकी व कर्जबाजारीपणा त्यातच प्रापंचिक प्रश्न या विवंचनेतून गळफास घेऊन आत्महत्या केली. सदरील घटना रविवारी दुपारनंतर शहरातील पाटील विहीर परिसरात घडली. विलास रामराव रोकडे असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.

यावर्षी पाऊस कमी पडल्याने विलास रोकडे यांच्या शेतातील सोयाबीन पिकाच्या उत्पादनात मोठी घट झाली.त्यामुळे बँकेचे कर्ज कसे फेडावे याच विवंचनेत राहत असत त्यातच घरसंसार, मुलांचे शिक्षण मुलीचे लग्न तसेच औषधाची उधारी यासारखे अनेक प्रश्न समोर उभे ठाकले असल्याच्या विवंचनेतून त्यांनी राहत्या घरी गळपास घेऊन मरणाला कवटाळले.

नातेवाईकांनी त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.परंतु तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले,त्यांच्या पश्चात आईवडील,पत्नी,दोन मुली,एक मुलगा असा परिवार आहे.या घटनेमुळे

घरातील कर्ता पुरुष गेल्याने रोकडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.परिसरातूनही हळहळ व्यक्त होत आहे. बातमी लिहीपर्यंत घटनेची नोंद पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झालेली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard Attack Farmer : इमानदार श्वानांची धाडसी कहाणी! बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचे प्राण वाचले, कुत्र्यांनी हल्ला करताच बिबट्याने...

U19 IND vs PAK: वैभव सूर्यवंशीला स्वस्तात रोखण्यात पाकड्यांना यश; पण आयुषच्या प्रहाराने झाले बेजार; चौकार- षटकारांची बरसात

Latest Marathi News Live Update: आपण सारे महाराष्ट्राची विचार करणारे लोक- देवेंद्र फडणवीस

Hacking Tips : तुमच्या मोबाईल स्क्रीनवर 3 रंगीत ठिपके बघितलेत का? फोन हॅक झालाय का पाहायचं असेल तर 'हे' एकदा चेक कराच

मनपा निवडणुकीबाबतची सर्वात मोठी अपडेट समोर! राज्यातील २९ महापालिकेच्या निवडणुका एकाच टप्प्यात? आचारसंहिता होणार लागू

SCROLL FOR NEXT