file photo 
मराठवाडा

परभणी : कोरोना संसर्गजन्य रुग्ण बाहेर फिरला तर गुन्हा दाखल करणार- उमाकांत पारधी

विलास शिंदे

सेलू ( जिल्हा परभणी ) : गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सर्वांनी प्रयत्न केले व त्याला यश देखील आले. परंतु सद्य: स्थितीत 'कोरोना' संसर्गाचा वेग वाढत आहे. त्यासाठी सर्व स्तरातून पुन्हा प्रयत्न होणे गरजेचे आहे. सर्वांनी समन्वय ठेऊन सेलू तालुका दिशादर्शक ठरावा यासाठी प्रयत्न करावेत.नसता कोरोना संसर्गजन्य व्यक्ती बाहेर फिरला तर त्याच्यावर गुन्हा दाखल करणार असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी यांनी सोमवारी ( ता. २२ ) रोजी येथील बैठकीत केले.

सेलू तालुका आपत्ती प्राधिकरण यांच्या वतीने 'कोरोना' प्रतिबंधात्मक उपाययोजना बैठकीचे आयोजन येथिल साई नाट्यगृहात करण्यात आले होते. या बैठकीला आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, नगराध्यक्ष विनोद बोराडे, पोलिस उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाल, तहसिलदार बालाजी शेवाळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरबडे, उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, जिल्हा परिषद सदस्य अशोक काकडे, सहायक पोलिस निरिक्षक अजयकुमार पांडे, उपमुख्याधिकारी अक्षय पल्लेवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलतांना श्री. पारधी  म्हणाले की, नागरिक व प्रशासनातील दुरी कमी होऊन सुसंवाद साधावा यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना पासूनची जीवित हानी वाचावी यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. परंतु सर्व घटकांनी यासाठी शासनाकडून देण्यात आलेल्या त्रिसूत्रीचा वापर कटाक्षाने करावा तसेच सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून लोकप्रतिनिधींनी जनजागृतीसाठी प्रयत्न करावा. टेस्टिंग, लसीकरण व उपाय यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. परंतु नागरिकांनी देखील यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. संजय हरबडे यांनी कोरोनाच्या संसर्गा बाबत व त्यावर केल्या जात असलेल्या उपाय योजनांची सविस्तर माहिती दिली. तसेच शहरातील कोणत्याही आस्थापना बंद न करता कोरोनाचा संसर्ग कमी कसा करता येईल यासाठी तालुका प्रशासन प्रयत्नात आहे. असे यावेळी तहसिलदार बालाजी शेवाळे यांनी सांगितले. लसीकरणासाठी शहरात व ग्रामीण भागात लसीकरण केंद्र वाढवावीत अशी सूचना यावेळी नगराध्यक्ष विनोद बोराडे व अशोकराव काकडे यांनी केली.

शेतकऱ्यांना व छोट्या व्यापाऱ्यांना त्रास न होता प्रशासनाने कोरोना बाबत प्रतिबंधात्मक उपाय योजना करावी व नागरिकांनी देखील नियमांचे पालन करावे व प्रशासनाने घालून दिलेल्या नियमाचे उल्लंघन केल्यानंतर कृपया लोकप्रतिनिधींना फोन करु नये, असे आवाहन यावेळी आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी केले. उपस्थित नागरिकांनी देखील यावेळी मते मांडली व प्रशासनातील त्रुटीची जाणीव करुन दिली.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railway : नवरात्रोत्सवापासून ते दिवाळीपर्यंत... 'या' राज्यात धावणार विशेष गाड्या; 6,000 गाड्यांचं नियोजन, पाहा रेल्वेचं वेळापत्रक

Women Health: पाळी, गरोदरपणा आणि रजोनिवृत्तीचा स्त्रियांच्या आतड्यांवर परिणाम; वाचा डॉ. राकेश पटेल यांचे सविस्तर मार्गदर्शन

Gemini AI Photo Trend: जगातील नेत्यांसोबत हायपर-रिअ‍ॅलिस्टिक फोटो तयार करा! जाणून घ्या सोप्या स्टेप्स...

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजना बंद होणार नाही: मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही

SIP Top 5 Mistakes: SIP मध्ये गुंतवणूक करताय? या 5 चुका टाळा, नाहीतर रिटर्न्स मिळण्याऐवजी नुकसान होऊ शकतं

SCROLL FOR NEXT