Ashok-Chavan
Ashok-Chavan 
मराठवाडा

राज्य शासन असंवेदनशील - अशोक चव्हाण

सकाळवृत्तसेवा

परभणी - मराठवाड्यात एकामागून एक येणाऱ्या संकटांबाबत शासन गंभीर नाही. गारपिटीला 72 तास उलटले तरी साधे पंचनामे करण्याचे कामही केले जात नाही. यावरून राज्य शासनाची असंवेदनशीलता दिसून येते, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बुधवारी (ता. 14) केली. कॉंग्रेसच्या वतीने आयोजित कार्यकर्ता शिबिरासाठी ते परभणीत होते. शिबिराच्या उद्‌घाटनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

गारपिटीमुळे मराठवाडा व खानदेशातील रब्बी पिके, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. यात सात लोकांचा बळी गेला. या नुकसानीची मी पाहणी करत आहे. 48 तासांत मदत जाहीर करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते; परंतु 72 तास उलटून गेले तरी नुकसानीचे पंचनामे सुरू झाले नाहीत. गारपिटीत पूर्णा तालुक्‍यातील भागीरथीबाई कांबळे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबाला कोणतीही मदत शासनाने जाहीर केलेली नाही. यावरून शासनाची असंवेदनशीलता दिसून येते, अशी टीका त्यांनी केली.

आत्महत्या रोखण्यासाठी मंत्रालयाला जाळ्या लावल्या जात आहेत; पण शेतीच्या पिकाला दाम व बेरोजगारांच्या हाताला काम या दोन गोष्टींवर शासनाने लक्ष दिले तर जाळ्या लावण्याच्या कामाची गररज पडणार नाही, असा टोलाही श्री. चव्हाण यांनी लगावला. याबाबत विधिमंडळात मुद्दा उपस्थित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आम्हालाच यश मिळणार
येत्या विधानसभा व लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पक्षपातळीवर संघटन बांधणीचे काम सुरू आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर कार्यकर्त्यांची शिबिरे घेत आहोत. समविचारी पक्षांशी आघाडी करण्यासाठी प्रदेश पातळीवर बैठक घेऊन त्याचा अहवाल राष्ट्रीय पातळीवर पाठविला जाणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष याबाबत निर्णय घेतील, असेही चव्हाण यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT