Rain Damaged Crops Nilanga 
मराठवाडा

शेंगाला कोंब फुटताहेत, आता कशानं कर्ज फेडावं साहेब, रात्रभर झोप येत नायं

राम काळगे

निलंगा (जि.लातूर) : आवंदा वेळवर पेरणी झाली..पीक... बी. जोमात आलं होतं. काय तर हाताला लागल असं वाटत व्हतं. अतिवृष्टीच्या पावसामुळे सगळं गेलं. मूग बाबडे झाले. उडीद काळे पडले. अन् आता उभ्या हिरव्या सोयाबीनला कोंब फुटताहेत. जगावं कसं रात्रभर झोप येईना या शब्दात शेतकऱ्यांनी दुःख व्यक्त केले आहेत.

यंदा जून महिन्यामध्ये मृग नक्षत्रात चांगल्या प्रकारे पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांची खरीप पेरणी वेळेवर झाली. तशी परिस्थिती समाधानकारक असली तरी मध्यंतरी मोठ्या प्रमाणात पावसाने काही कालखंड उघडीप दिली होती. त्यामुळे हलक्या प्रतीच्या जमिनीवर व त्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. तालुक्यात सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून सर्वाधिक पेरा या पिकाचा असताना नगदी पीक म्हणून शेतकरी या पिकाचे उत्पन्नावर भविष्यातील नियोजन करीत असतो.


मागील काळात पावसाची उघडीपमुळे शेतकऱ्यांचे मूग हाताला लागले नाहीत. उडीद काळे पडून गेले, अशा परिस्थितीत शेतकरी अडचणीत असताना गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे पिकाची परिस्थिती असमाधानकारक झाली आहे. सतत पडत असलेल्या जोरदार पावसामुळे पाणीपातळीत वाढ झाली आहे. या पावसामुळे हिरव्या सोयाबीनच्या शेंगाला कोंब फुटले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा नैसर्गिक आपत्तीबरोबर आर्थिक अरिष्ठ आले आहे. शनिवारी (ता.१९) पहाटे निलंगा तालुक्यातील तुपडी, शिवणी-कोतल परिसरात झालेल्या पावसामुळे ओढ्याला पूर आला आहे.

मसलगा मध्यम प्रकल्पाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली असून तालुक्यातील हंगरगा, बडूर, निलंगा, जाऊ, शेडोळ, केदारपुर या प्रकल्पातील पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून मांजरावर व तेरणा या दोन्ही नद्यांना पूर आला आहे. शिवाय रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील ताजपुर, शिवणी- कोतल , आनंदवाडी- शिवणी कोतल, तुपडी, शेडोळ, हाडगा, ऊमरगा या भागातील ओढ्यांना पूर आला असून लातूर ते निलंगा तुकडी मार्ग हा रस्ता काही काळ बंद होता.

ओढ्याच्या पात्रात बाहेर पाणी पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. शिवाय मांजरावर तेरणा नदीच्या पात्रात बाहेर पाणी पडत असल्यामुळे नदी काठच्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. हिरव्या उभ्या सोयाबीन पिकाला कोंब फुटत असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला असून सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात असलेली उत्पन्न हाताला लागेल की नाही, अशी भीती शेतकऱ्याकडून व्यक्त केले जात आहे. त्यामुळे पिकाचे त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

संपादन- गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Monorail : मुंबईकरांसाठी मोठी बातमी ! मोनोरेल अनिश्चित काळासाठी बंद , MMRDA ने का घेतला निर्णय ?

Asia Cup 2025 : आशिया कपमधून माघार घेतल्यास पाकिस्तान बोर्ड लागणार भिकेला? तब्बल 'इतक्या' दशलक्ष डॉलरचं होईल नुकसान

Latest Marathi News Updates : पंतप्रधान मोदींना डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन; 75 व्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा

Karad Accident: दुर्दैवी घटना! 'कालेटेकच्या दोघांचा अपघाती मृत्यू'; भरधाव चारचाकीची मोटारसायकला पाठीमागून भीषण धडक..

मोठी बातमी! संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील ‘या’ लाभार्थींना आता दरमहा मिळणार २५०० रुपये; सामाजिक न्याय विभागाचा निर्णय; ऑक्टोबरपासून वाढीव लाभ

SCROLL FOR NEXT