मराठवाडा

पावसाचा फटका; अर्धे लातूर अंधारात 

सकाळ वृत्तसेवा

लातूर -  वादळी वाऱ्यासह झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसाचा फटका बसल्यामुळे शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे सोमवारी (ता. तीन) अर्धे लातूर अंधारात होते. दुसऱ्या दिवशीही (ता. चार) शहरातील अनेक भागांत हीच स्थिती कायम होती. दुसरीकडे वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडणे, फांद्या तुटणे, फ्लेक्‍स कोसळण्याच्याही घटना शहरात अनेक ठिकाणी घडल्या. त्यामुळे महावितरणसह पालिका प्रशासनाची झोप उडाल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले. यानिमित्ताने पावसाळी कामे किती सफाईदारपणे झाली आहेत, हेही "उजेडात' आले. 

राज्याच्या अनेक भागांत सोमवारी (ता. तीन) अवकाळी पाऊस येईल, असा इशारा हवामान खात्याने आधीच दिला होता. त्यानुसार लातूर शहरात आणि जिल्ह्यात अनेक भागांत सायंकाळी सातच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. त्याचवेळी शहरातील जवळजवळ सर्वच भागातील वीजपुरवठा खंडित झाला. टप्प्याटप्प्याने काही भागातील वीजपुरवठा सुरळीत झाला; पण बहुतांश भागातील वीज मंगळवारी सायंकाळपर्यंत सुरळीत झाली नाही. त्यामुळे अनेक लातूरकरांना सोमवारची रात्र अंधारात आणि मंगळवारची दुपार उकाड्यात काढावी लागली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार मतदानापूर्वी राहुल गांधींचा 'हायड्रोजन बॉम्ब', केंद्राने कसं मॅनेज केलं, धक्कादायक आरोप अन् पुरावे एका क्लिकवर

Uddhav Thackeray In Beed : ''फडणवीस दगाबाज, सत्तेबाहेर करणं हाच पर्याय''; ठाकरेंचा शेतकऱ्यांशी संवाद, बच्चू कडूंच्या आंदोलनावरही बोलले...

Solapur Crime: 'साेलारपुरात महिला डॉक्टरचा रुग्णाकडून विनयभंग'; न्यायालयाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी..

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका घेणार निरोप? अभिनेत्रीच्या पोस्टची रंगली चर्चा; म्हणाली- शेवटचा दिवस....

Pune Railway Station : दिवाळीत ३५ लाख नागरिकांचा रेल्वे प्रवास; पुण्यातून धावल्या नियमित अन्‌ विशेष ११०० गाड्या

SCROLL FOR NEXT