Raju Shetty criticizes CM Devendra Fadnavis at Beed 
मराठवाडा

महाजनादेशपुढे मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील दुष्काळाची आठवण होईना : राजू शेट्टी

अशोक कोळी

धानोरा (बीड) : मराठवाड्यात तिव्र दुष्काळी परिस्थिती आहे. जनावरांना चारा नाही, नागरिकांना पाणी नाही, शेतकरी आडचणीत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेत गुंग आहेत. त्यांची महाजनादेश यात्रा मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत येऊन गेली. मात्र, त्यांना दुष्काळाची आठवण झाली नाही असा आरोप स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केला.

मुखमंत्र्यांचे फक्त विधानसभा निवडणुकीवर लक्ष आहे, असा आरोपही त्यांनी केला. परिसरातील आपेगाव (ता. अंबाजोगाई) येथे मंगळवारी (ता. 17) दुष्काळमुक्तीचा महासंग्राम मेळाव्यात शेट्टी बोलत होते. 

राजू शेट्टी म्हणाले, सरकार केवळ आश्वासनचा पाऊस पाडून जनतेची दिशाभूल करीत आहे. सरकार उद्योगपतीच्या हिताचे आहे. जिल्ह्य़ातील हजारो शेतकरी पिक विम्या पासून वंचित आहेत. सरकार  विमा कंपनीवर कारवाई करण्याऐवजी पाठराखण करीत आहे. विमा कंपनी मोठी लुट करीत असून समृद्धी महामार्गासाठी, बुलेट ट्रेनसाठी सरकार कडे पैसे आहेत. दुष्काळामुळे मराठवाडय़ातील नागरिक स्थलांतर करीत असताना सरकार कडे दुष्काळ निवारणासाठी पैसे नाहीत असेही शेट्टी म्हणाले. सरकार आल्यानंतर शेतीला पाणी आणी शेती मालाला भाव देण्याचे आश्वासन पाळले नाही म्हणून सरकारची साथ सोडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढल्या पिढीच्या भविष्यासाठी व न्याय हक्कासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल असे आवाहन राजू शेट्टींनी केले. अध्यक्षस्थानी बाळासाहेब देशमुख होते. तर, डाॅ. प्रकाश पोकळे, रसिका ढगे, सत्तार पटेल, विजय जाधव जयजित शिंदे, कुलदीप करपे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT