NND22KJP01.jpg
NND22KJP01.jpg 
मराठवाडा

दिलासादायक : ३६३ खातेदारांना अडीच कोटींची कर्जमुक्ती

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील सोनखेड (ता. लोहा) व कामठा बुद्रुक (ता. अर्धापूर) या दोन गावातील आधार प्रमाणीकरण झालेल्या ३६३ खात्यांवर दोन कोटी ४६ लाख रुपये कर्जमाफीची रक्कम जमा झाली आहे. उर्वरीत पात्र शेतकऱ्यांना लवकरच कर्जमुक्ती मिळेल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रविण फडणीस यांनी दिली.

दोन गावांना प्रायोगीक तत्वावर लाभ
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात दोन लाख १४ हजार ४९१ खाते कर्जमुक्तीसाठी पात्र ठरली आहेत. यातील दोन लाख १२ हजार ७५९ खात्यांचे आधारलिंक झाले आहेत. तर एक लाख ९५ हजार ८२५ खाते पोर्टलवर डाटा अपलोडचे काम झाले आहे. पात्र खातेदारांना कर्जमुक्तीसाठी एक हजार ४६१ कोटी ३६ लाख रुपये लागतील, असा अंदाज आहे. दरम्यान जिल्ह्यातील सोनखेड येथील २६१ व कामठा बुद्रुक येथील १६२ अशा एकूण ४२३ खात्यांचे प्रायोगीक तत्वावर आधार प्रमाणीकरण करण्यात आले होते. या दोन गावातील ४०१ खात्याचे आजपर्यंत आधार प्रमाणीकर झाल्यामुळे यातील ३६३ खात्यावर कर्जमाफीची दोन कोटी ४६ लाख रुपये रक्कम जमा केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणीस यांनी दिली.

महाविकास आघाडीची कर्जमुक्तीची घोषणा
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. यात दोन लाखांपर्यंत कर्जमाफ करून सर्वाधिक शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, असे सांगितले. यात शासनाच्या निकषानुसार जिल्ह्यातील २३ बॅंकांच्या वेगवेगळ्या शाखेतील आतापर्यंत दोन लाख १४ हजार ४९१ शेतकऱ्यांची थकीत खाते कर्जमुक्तीसाठी पात्र ठरली आहेत. यातील दोन लाख १२ हजार ७५९ खात्यांचे आधारलिंक झाले आहे. तर डाटा अपलोडचे कामही अंतिम टप्प्यात आहे. या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक हजार ४६१ कोटी लागतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. परंतु, शासनाने यानंतर दोन लाखांवरील कर्ज असलेल्या खातेदारांना कर्जमुक्तीची संधी दिल्याने यात खातेदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तसेच चालू खातेदारांनाही प्रोत्साहन योजनेत वाढ केल्याने कर्जमाफीची रक्कम वाढण्याची शक्यता आहे. या सर्व शेतकऱ्यांना आता कर्जमुक्तीची प्रतीक्षा लागली आहे.

कर्जमुक्ती योजनेचा शुभारंभ
जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणीकरण करण्याच्या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. लोहा तालुक्यातील सोनखेड व अर्धापूर तालुक्यातील कामठा बुद्रुक येथील थकबाकीदार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करून घेण्याची प्रक्रिया कामठा येथे झाली.
सोनखेड येथील २६१ व कामठा बुद्रुक येथील १६२ पात्र असे एकूण ४२३ शेतकऱ्यांची यादी शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यातील ४०१ खात्यांचे आधार प्रमाणीकरण केल्यानंतर ३६३ खात्यावर दोन कोटी ४६ लाख रुपये शासनाकडून वर्ग करण्यात आले. पैसे जमा झालेल्या खातेदारांच्या याद्या ग्रामपंचायत, बँक शाखा, आपले सरकार सेवा केंद्र येथे प्रसिद्ध होणार आहेत. 

दोन लाख १४ हजार ४९१ खाते पात्र
आजपर्यंत जिल्ह्यातील दोन लाख १४ हजार ४९१ शेतकऱ्यांचे खाते कर्जमुक्तीसाठी पात्र ठरली आहेत. यातील दोन लाख १२ हजार ७५० खात्यांचे आधारलिंक करण्याचे काम झाले आहे, तर एक हजार ७४१ खाते आधारलिंक करणे बाकी आहे. यातील एक लाख ७० हजार ३९७ खात्यांची माहिती बँकांद्वारे पोर्टलवर अपलोड केली आहे. उर्वरित शेतकऱ्यांची माहिती बँकांद्वारे अपलोड करण्याचे कामकाज चालू आहे. जिल्ह्यात एक हजार ५४५ आपले सरकार केंद्र व जिल्ह्यातील सर्व बँकास्तरावर आधार प्रमाणीकरणाचे कामकाज केले जाणार आहे. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर शेतकऱ्यांने आपले सरकार सेवा केंद्र, सामूहिक सुविधा केंद्र, बँकेचे शाखेकडून आधार प्रमाणीकरण झाल्याचे प्रमाणपत्र घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी केले आहे.

दोन कोटी ४६ लाख रुपये जमा
जिल्ह्यातील दोन लाख १४ हजार ४९१ खाते कर्जमुक्तीसाठी पात्र ठरली आहेत. सोनखेड व कामठा बुद्रुक या दोन गावातील ४२३ खात्यापैकी आधार प्रमाणीकरण झालले्या ४०१ खात्यापैकी ३६३ खात्यांवर दोन कोटी ४६ लाख रुपये कर्जमाफीची रक्कम जमा झाली आहे.
- प्रवीण फडणीस, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था), नांदेड.
   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT