file photo 
मराठवाडा

दहा एकर सोयाबीनवर शेतकऱ्याने फिरविले रोटाव्हेटर

राजेश दारव्हेकर

हिंगोली : कोरोनाच्या संकटाने हतबल झालेल्या शेतकऱ्यांसमोर आता नवीनच संकट उभे राहिले आहे. शेतकऱ्यांचे खरिपातील नगदी पीक म्हणजे सोयाबीन परतीच्या पावसाने खराब झाले आहे. सतत झालेल्या पावसाने खराब झालेले सोयाबीन काढण्यासाठी होणारा खर्च परवडणारा नसल्याने सेनगाव तालुक्यातील भानखेडा येथील शेतकऱ्याने दहा एकर सोयाबीनवर रोटावेटर फिरवला आहे. तर, आणखी दोन शेतकरी १५ एकर क्षेत्रावर रोटावेटर फिरवण्याच्या तयारीत आहेत.

हिंगोली जिल्ह्यात हजारो हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पिकाचे पावसाने नुकसान झाले आहे, सेनगाव तालुक्यातील भानखेडा येथील ज्ञानबा कोटकर  यांच्याकडे दहा एकर शेती आहे. त्यांनी सोयाबीनची पेरणी केली. सुरुवातीपासून चांगला पाऊस असल्याने सोयाबीनची वाढ चांगली झाली होती. मात्र, शेंगा कमी लागल्या. आता परतीच्या पावसात आलेल्या शेंगाही पूर्णपणे भिजल्या. सोयाबीनचे एक पोते काढण्यासाठी तीन हजार रुपये तर, मळणी यंत्रामधून काढण्यासाठी एक क्विंटलला बाराशे रुपये मोजावे लागतात. अगोदरच सोयाबीनला शेंगा कमी आणि त्यात काढणीसाठीही जास्त खर्च परवडणारा नाही. त्यामुळे कोटकर यांनी दहा एकरवर रोटावेटर फिरवण्यास सुरुवात केली आहे. 

शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला

ज्ञानबा यांचे अनुकरण करत परिसरातील काही शेतकऱ्यांनीही आपल्या शेतातील सोयाबीनवर रोटावेटर फिरवण्याची तयारी सुरू केली आहे. परतीच्या पावसाचा कहर -सुरुवातीला योग्य प्रमाणात पाऊस आल्याने शेतकऱ्यांचे पीक जोमात होते. मात्र, पीक तयार झाले आणि जोरदार परतीच्या पावसाला सुरुवात झाली. यात हजारो हेक्टर सोयाबीनचे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. त्यामुळे मन घट्ट करून पीक नष्ट करण्याचा निर्णय घेण्याची वेळ आल्याचे शेतकरी सांगत आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीन काढून टाकले. मात्र, सोयाबीन गोळा करण्याच्या वेळी आलेल्या पावसाने सोयाबीनला पूर्णपणे बुरशी लागली आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी देखील सोयाबीन गोळा करण्याचे सोडून दिले आहे.

विरोधी पक्षनेत्यांनी देखील नुकसानीची पाहणी केली

नेत्यांच्या भेटी, तरीही पंचनामे नाहीच . जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री, कृषिमंत्री एवढेच नव्हे तर, विरोधी पक्षनेत्यांनी देखील नुकसानीची पाहणी केली. मात्र, त्यांच्या पाहणीनंतरही नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे आता शासनाकडून काही नुकसान भरपाई मिळेल, याची आशाच सोडून दिल्याचे शेतकरी पोटतिडकीने सांगत आहेत. सोयाबीनशिवाय आमच्याकडे दुसरे काहीही नाही. त्यावरही रोटावेटर फिरवण्याची वेळ आल्याचे  शेतकरी अर्जुन कोटकर यांनी सांगितले. दरम्यान, जिल्ह्यात शेतीची विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. शासन आता शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काय टाकते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Play Off Scenario: गुजरात टायटन्सचा सलग पाचवा विजय! सनरायझर्स हैदराबादला नमवून POINT TABLE मध्ये अव्वल, अनपेक्षित कलाटणी

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सच्या संघात बदल... प्ले ऑफच्या शर्यतीसाठी मिळालं बळ... पुण्याच्या रामकृष्ण घोषच्या जागी एन्ट्री

Triple Accident : रजापूर शिवारात तिहेरी अपघात; वाळू वाहतूक करणारा हायवा पलटी, दोन कारची धडक, चार ते पाच जण किरकोळ जखमी

Amit Satam: पंतप्रधानांच्या 'इंधन बचती'ला मुंबई भाजपचा हरताळ; अमित साटम यांचा २५ गाड्यांचा 'शाही' ताफा वादाच्या भोवऱ्यात!

GT vs SRH Live : टप्पा खाऊन आऊट... अभिषेक शर्मा विचित्र पद्धतीने बाद झाला, कागिसो रबाडाला हसू आवरेना... Video Viral

SCROLL FOR NEXT