file photo
file photo 
मराठवाडा

संत साहित्य हे दुभंगलेली मने जोडण्याचे महान कार्य करते - प्रा. सुपारे

राजेश दारव्हेकर

हिंगोली : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व मराठवाडा साहित्य परिषद हिंगोलीच्या वतीने   मराठी भाषा पंधरवाडा निमित्त व ज्ञानपीठ विजेते वि.स.खांडेकर यांच्या जयंती  निमित्ताने परिसंवादाचे मंगळवारी ता. १९  अंतुले नगर भागातील  अर्धापुरकर यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता. 

महाराष्ट्र शासनाने १४  जानेवारी ते २८ जानेवारी हा पंधरवाडा साजरा करण्याचे सांगितले होते. हिंगोली येथील मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने मराठी भाषा पंधरवडा दिनानिमित्त परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाचा विषय मानसिक स्वास्थ्यासाठी संत साहित्याची अपरिहार्यता  हा होता.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मसापचे अध्यक्ष अशोक अर्धापुरकर  तर  प्रमुख वक्ते म्हणून प्रा. उत्तम सुपारे, कवि रतन आडे, लेखक नरेंद्र नाईक,  दत्ता पुरी , कवि महारुद्र घेणेकर यांची उपस्थिती होती. 

मराठी भाषा पंधरवाडा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात मुख्य वक्ते म्हणून प्रा. उत्तम सुपारे यांनी आपले विचार मांडताना असे सांगितले की  स्त्री संत महिलांनी खऱ्या अर्थाने अध्यात्मिक लोकशाहीची पायाभरणी केली आहे. त्याचप्रमाणे विविध संतांच्या विचारांची उदाहरणे दिली. संत साहित्यामुळे समाजातील दुभंगलेली मने जोडण्याचे महान कार्य संतांनी केले आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. 

त्यानंतर दुसरे वक्ते दत्ता पुरी यांनी अनेक संतांचे संदर्भ देत पसायदानातील रचना सौंदर्य  व समकालीन संतांच्या योगदानावर सविस्तर माहिती दिली. त्याच प्रमाणे महारुद्र घेणेकर यांनी  सध्याच्या परिस्थितीत बोकाळलेल्या जातीय वादावर तीव्र निषेध व्यक्त करत भागवत धर्माच्या माध्यमातून व भक्तिमार्गातून समाजात परिवर्तन होत असल्याचेही सांगितले. तर परिसंवादात कवी रतन आडे यांनी आपले विचार मांडताना असे सांगितले की कोरोनाच्या परिस्थितीतही संत महंतांचे विचार, त्यांचे तत्त्व समाजासमोर आदर्श आहेत. सामाजिक व नैसर्गिक पर्यावरणाचे संतुलन राखण्यास संतांचे विचार खुप महत्वाचे आहेत. असे त्यांनी यावेळी सांगितले. या परिसंवादाचे अध्यक्ष अशोक अर्धापुरकर यांनी साहित्य आणि संस्कृती मंडळाची भूमिका स्पष्ट केली. जागतिक उदात्तीकरणात कोव्हीड-१९ या प्रादुर्भावामुळे आर्थिक व्यवस्था उद्ध्वस्त झाली असतानाही संतसाहित्य हे मार्गदर्शक ठरत आहे असे सांगितले.यावेळी नरेंद्र नाईक, प्रा.जयप्रकाश पाटील गोरेगावकर, डॉ.विकास साळवे, पांडुरंग गिरी, दिलीप धामणे, विजय गुंडेकर, रतन आडे यांच्या सह रसिकांची उपस्थिती होती. परिसंवादाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कवि कलानंद जाधव यांनी केले. तर प्राचार्य  नामदेव वाबळे यांनी उपस्थितींचे आभार मानले.

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT