Sharad Pawar criticizes BJP government on the topic of farmers and youth
Sharad Pawar criticizes BJP government on the topic of farmers and youth 
मराठवाडा

सरकारच्या चुकीच्या धोरणाने तरुण पिढी, शेतकरी अस्वस्थ : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा

बीड : सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा कार्यक्रम राबविला नाही. तसेच उद्योग बंद पडत असल्याने बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे राज्यात तरुण पिढी व शेतकरी अस्वस्थ असल्याचे आपण पाहत आहोत. याला सरकारचे चुकीचे धोरण कारणीभूत असल्याची टिका जेष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. 

बीड जिल्ह्यात मुक्कामी असलेल्या शरद पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. 18) राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता संवाद मेळावा झाला. यात पवार बोलत होते. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जेष्ठ नेते शिवाजीराव पंडित, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश सोळंके, प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, महिला आघाडीच्या रुपाली चाकणकर, युवक आघाडीचे महेबुब शेख, डॉक्टर आघाडीचे डॉ. नरेंद्र काळे उपस्थित होते. पवार म्हणाले, राज्यात यंदा 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. घामाने पिकविलेल्या मालाची किंमत भेटत नाही त्यामुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्याने शेतकरी हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे शरद पवार म्हणाले. आपण केंद्रात मंत्री असताना 71 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. या सरकारने दिलेल्या कर्जमाफीत ऑनलाईमुळे केवळ 40 टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली असून 60 टक्के शेतकऱ्यांच्या डोक्यावर अद्यापही कर्जाचा बोजा असल्याचे शरद पवार म्हणाले. 

सत्तेच्या काळात शिक्षण संस्था, कारखाने काढून तरुणांना रोजगार उपलब्ध करुन दिले. परंतु, आताच्या धोरणामुळे कारखाने व उद्योग बंद पडत आहेत. मुंबईत कधीकाळी 120 कापड गिरण्यांत चार लाख लोक काम करत. यातील 116 गिरण्या बंद पडल्या असून केवळ चार सुरु असल्याचेही शरद पवार म्हणाले. परवा नाशिकमध्ये असताना कामगार आपल्याला भेटले. 42 उद्योग बंद पडल्याचे सांगून 16 हजार लोकांचे रोजगार गेल्याचे त्यांनी आपल्याला सांगीते असेही शरद पवार म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT