ST Workers Strike News
ST Workers Strike News esakal
मराठवाडा

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थ्यांचे होतेय नुकसान

अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जवळपास दीड वर्ष शाळा कुलुपबंद होत्या. दिवाळीपूर्वी शाळा, महाविद्यालय सुरू झाले होते. त्यात पुन्हा दिवाळी सुट्यामुळे खंड पडला होता. आता शाळा, महाविद्यालय सुरु झाले आहे. मात्र ग्रामीण भागातुन शहरात अथवा नजीकच्या शाळा, महाविद्यालयात जाण्यासाठी एसटीचा पर्याय नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दरम्यान अहिल्यादेवी होळकर मोफत पास योजनेअंतर्गत जवळपास दीड हजार विद्यार्थीनी लाभार्थी आहेत. मात्र बस बंद असल्याने मुलींचा हिरमोड झाला आहे. काही मोजक्या मुली खासगी वाहनाचा जीवघेणा प्रवास करून शिक्षणासाठी येताहेत. कोरोना संसर्गाच्या भितीने राज्य सरकार सावध पवित्रा घेत शाळा, महाविद्यालय टप्प्याटप्याने सुरू केले. शहरी भागातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग, तर ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले. गावापासून शाळेचे अंतर अधिक असल्यामुळे अनेक मुलांनी बसचा पास काढून शाळेत ये-जा करतात. पण संपामुळे बसचा पर्याय (ST Workers Strike) आहे उपलब्ध होत नसल्याने अडचण येत आहे. विशेषतः मुलींची अडचण होत आहे. पालकांना देखील मुलींना शाळेत कसे पाठवावे असा प्रश्न सतावत आहे. दरम्यान प्रदीर्घ काळात ऑनलाईन शिक्षणात डोकं खुपसल्याने विद्यार्थी, विद्यार्थीनींना ऑफलाईन (Umarga) शिक्षणाची उत्सुकता लागली होती. मोजकेच दिवस शाळा, महाविद्यालयात जाण्याचा योग आला. पण त्यात योगायोगाने एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाला आणि बसचा पर्याय बंद (Osmanabad) झाल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला. 

चार हजार विद्यार्थ्यांचा प्रश्न !

उमरगा बसस्थानकासह मुरूम व येणेगूर बसस्थानकातुन ज्या-ज्या भागातील विद्यार्थी व विद्यार्थीनींना प्रवासासाठी बसपासच्या पर्याय उपयूक्त ठरतो. एसटी महामंडळाने मुलींसाठी अहिल्यादेवी होळकर मोफत बसपास योजना सुरू केली. या योजनेत तालुक्यातील जवळपास दीड हजार मुली लाभार्थी आहेत. यात पंधरा शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थीनींचा समावेश आहे. तर कमी दरात रक्कम भरून पास काढलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अडीच हजार आहे. दरम्यान बस कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बसचा पर्याय उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना महागड्या खासगी प्रवास भाडे द्यावे लागते. त्यासाठीही प्रतिक्षा करावी लागते.

प्रतिक्षेलाही मर्यादा असाव्यात !

गेल्या २७ दिवसांपासुन विविध न्याय मागण्यासाठी सुरू असलेले एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजुनही सुरूच आहे. कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी, राज्यकर्ते व प्रशासनात तोडगा निघत नाही, हे लोकशाहीचे दुर्दैव आहे. आज गरिबांची लालपरी बंद असल्यामुळे सामान्य नागरिक, विद्यार्थी यांचे हाल होत आहेत. बस सुरू होण्याची किती प्रतिक्षा करावी, यालाही काही मर्यादा आहेत. राज्य सरकारने पर्याय म्हणुन खासगी वाहनांना मुभा दिलेली असली तरी त्यांच्याकडुन आकारले जाणारे भाडे सर्वसामान्यांना परवडणारे नाही.

ज्येष्ठांची होतेय घुसमट !

ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवासात सवलत असल्याने अनेक ज्येष्ठ नागरिक कामानिमित्ताने बसचा हमखास पर्याय शोधतात. मात्र गेल्या तीन आठवड्यांपासुन बस बंद असल्याने स्मार्ट कार्ड बाहेर काढण्याची संधीच मिळत नसल्याने ज्येष्ठांची घुसमट होत आहे. सध्या लग्नसराई असल्याने ज्येष्ठांना मान, सन्मान म्हणुन ज्येष्ठांना बोलावले जाते. परंतू डिझेल दरवाढीमुळे आणि बसच्या संपामुळे खासगी वाहनांसाठी अधिक पैसे मोजावे लागत असल्याने अनेक कार्यक्रमाला जाणे शक्य होत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT