Temperature
Temperature 
मराठवाडा

६१ वर्षांपूर्वीच्या विक्रमाची तापमानाने साधली बरोबरी

सकाळवृत्तसेवा

शहराचा पारा तब्बल ४३.६ अंशांवर 
औरंगाबाद - शहराच्या तापमानाने ६१ वर्षांपूर्वीच्या आपल्याच विक्रमाची बरोबरी साधली आहे. शनिवारी (ता. २७) उन्हाने कडाका दाखवत पारा ४३.६ अंशांवर नेला. यापूर्वी २६ एप्रिल १९५८ रोजी शहरात (एप्रिल महिन्यातील) सर्वोच्च तापमानाची नोंद झाली होती.

गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणाने शहराचे तापमान ४१ अंशांवरून खाली आणत ते ३९ अंशांवर आणून ठेवले होते. मात्र तापमानाचा पारा वाढत गेला आणि शनिवारी (ता.२६) चिकलठाणा वेधशाळेत ४३.६ अंश तापमानाची नोंद झाली. या तापमानाने आपल्याच विक्रमाची बरोबरी केली आहे. २६ एप्रिल १९५८ रोजी शहरात ४३.६ अंश तापमानाची नोंद झाली होती. हे तापमान गेल्या ६१ वर्षांतील (एप्रिल महिन्यातील) सर्वोच्च तापमान आहे.

...म्हणून आणखी ७२ तास पारा चढाच
औरंगाबाद - शहराचा पारा चढाच असल्याने घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. शनिवारी (ता. २७) तापमानाने आपल्याच विक्रमाची बरोबरी साधली. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राच्या संगमावर तयार होत असलेल्या एका वादळाने तापमानात वाढ झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. 

औरंगाबादेत शनिवारी (ता. २७) यंदाच्या वर्षातील सर्वोच्च अशा ४३.६ अंश तापमानाची नोंद झाली. शहराचा पारा वाढला असला तरी त्याचे कारण हे भारतीय उपखंडाखाली असलेल्या समुद्रात आहे. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर जेथे मिळतो, तेथे एका चक्री वादळाची निर्मिती झालेली आहे. हे वादळ औरंगाबादसह भारताच्या अन्य पठार प्रदेशातील आर्द्रता खेचून घेण्याचे काम करते आहे. औरंगाबादही त्याला अपवाद नसल्याने हवेतील आर्द्रता गायब झाली आणि तापमान वाढीला लागले आहे. औरंगाबादचा पारा हा ४४ अंशांवर जाण्याची शक्‍यता आहे. हे वादळ ३० एप्रिल अथवा १ मे दरम्यान चेन्नईलगतच्या किनाऱ्यावर धडकण्याची चिन्हे आहेत. त्यानंतर तापमान काही प्रमाणात कमी होणार असल्याची शक्‍यता एमजीएमच्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम अंतराळ केंद्राचे संचालक डॉ. श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT