tade
tade 
मराठवाडा

कोरड्या बंधाऱ्याकडे पाहण्याची आली वेळ 

जगन्नाथ पुरी

सेनगाव ः पावसाळ्यातील पडलेले पाणी अडवून साठवणूक करण्याच्या मुख्य उद्देशाने तालुक्यात विविध योजने अंतर्गत बंधाऱ्यांची कामे झाली आहेत. मात्र, योग्य नियोजनाचा अभाव व निकृष्ट दर्जाच्या कामामुळे योजनेच्या मूळ उद्देशालाच तडा गेला आहे. दोन वर्षांपूर्वी शहराजवळ बांधण्यात आलेल्या दोन बंधाऱ्यात थेंबभरही पाणीसाठा झाला नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे

मागील काही वर्षापासून तालुक्यातील नदी, नल्यावर मानव विकास, जलयुक्त शिवार योजना, यासह विविध योजने अंतर्गत मोठ्या प्रमाणात सिमेंट बंधाऱ्यांची कामे झाली आहेत. तालुक्यात सिंचन क्षेत्र अत्यल्प आहे. पावसाळ्यातील पडणारे पाणी त्या-त्या भागातील बंधाऱ्यात साठवणूक व्हावी, हा मुख्य उद्देश बंधारा निर्मितीमागे असतो. या पाण्याचा उपयोग जमिनीतील पाणी पातळी वाढवून बिगर पावसाळी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना करता यावा, शिवाय जनावरांना पाणी पिण्यासाठी उपयोगी व्हावे यासह विविध महत्वकांक्षी उद्देश या योजने पाठीमागे आहेत. दरम्यान, कोट्यावधी रुपये बंधारे बांधकामावर मागील काही वर्षात खर्च झाले आहेत. मात्र, त्या तुलनेत उद्देश पूर्ती झाली नाही.

मातीमिश्रित वाळूच्या वापराने बंधाऱ्याला तडे
तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरडवाहू जमिनीचे क्षेत्र असल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचा प्रमुख खरीप हंगाम राहतो. पाणी अडवून साठवणूक सिमेंट बंधाऱ्याच्या माध्यमातून झाले असते तर रब्बी हंगामातील शेती पिकाला त्याचा मोठा फायदा होऊ शकला असता. मात्र, योग्य नियोजन व निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पावसाळ्यात पडणारे पाणी चक्क बंधाऱ्यातून वाहून जाण्याचे प्रकार घडतो. सेनगाव शहरापासून काही अंतरावरील शेत शिवारात दोन सिमेंट बंधाऱ्यांचे काम दोन ते तीन वर्षांपूर्वी झाले होते. त्या कामात दर्जेदार बांधकाम साहित्य वापरण्यात आले नाही. मातीमिश्रित वाळूचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याने त्या बंधाऱ्याला तडे गेले आहेत.

तालुक्यातील बऱ्याच बंधाऱ्याची हीच स्थिती
ऑक्टोबर महिन्यात परतीचा भरपूर पाऊस झाला होता, ते पाणी साठविल्या जाणे अपेक्षित होते. मात्र, असे झालेच नाही. तेथे सद्यस्थितीत थेंबभरही पाणीसाठा झाला नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्यांचा उपयोग कशासाठी हा प्रश्न नागरिकांतून उपस्थित करण्यात येत आहे. तालुक्यातील बऱ्याच बंधाऱ्याची हिच स्थिती आहे.
शासनाकडून मोठा गाजावाजा करून विविध योजने अंतर्गत जलसंधारणाची कामे केली जातात. मात्र त्याचा योजना उद्दिष्टासाठी उपयोग व्हावा याकडे दुर्लक्ष केले जाते. बंधाऱ्यांची कामे झाल्यानंतर कागदोपत्री सिंचनक्षेत्र वाढल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात वेगळी स्थिती पहावयास मिळत आहे. कामे होत असताना प्रशासनाकडून विशेष लक्ष दिले जात नाही. त्यामुळे कंत्राटदारांकडुन मनमानी कारभार होतो. 

असाच प्रकार बहुतांश ठिकाणी घडला
शहराजवळ असलेल्या शिवारात दोन ते तीन वर्षांपूर्वी जलयुक्त शिवार योजना अंतर्गत दोन सिमेंट बंधाऱ्याचे काम करण्यात आली. त्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले प्रशासनाचा योग्य नियोजन अभाव व निकृष्ट दर्जाच्या झालेल्या कामांमुळे त्या बंधाऱ्यात आजघडीला थेंबभर पाणी साठविले गेले नाही. असाच प्रकार बहुतांश ठिकाणी घडला असून त्या कामांची चौकशी करण्याची गरज आहे. -उमेश देशमुख, नगरसेवक. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...पुण्यात नेमकं काय घडलं?

Session Court : लैंगिक छळ प्रकरणात माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांचे नाव वापरण्यास बंदी; न्यायालयाचा आदेश जारी

Rohit Sharma : 6,8,4,11 आणि 4... वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला झालं तरी काय? BCCI अन् चाहते टेन्शनमध्ये

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

मतदान करण्यासाठी गेलेला मतदार जाग्यावरच कोसळला, अन्... महाड तालुक्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT