Latur News
Latur News  
मराठवाडा

लातूर जिल्ह्यात बारा परप्रांतीय आल्याने उडाली प्रशासनाची झोप

हरी तुगावकर

लातूर ः कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून देशभर टाळेबंदी करण्यात आली आहे. असे असताना सुद्धा नागरिकांचा इतर राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्या येण्याचा प्रवास काही केल्या थांबत नाही. असाच एक प्रकार निलंगा येथे घडला आहे. गुरुवारी (ता.दोन) परराज्यातून बारा नागरिक एका वाहनाने आले. रात्रभर राहिले. याची कानोकान कोणालाही खबर नव्हती. पण शुक्रवारी (ता.तीन) सकाळी वाऱ्यासारखी ही बातमी सर्वत्र पसरली. याने प्रशासन व पोलिसांची मात्र झोप उडवली. या सर्वांना ताब्यात घेण्यात आले असून त्याना चौदा दिवस क्वॉरन्टाईन केले जाण्याची शक्यता आहे.


हरियाणातील हिसार व फिरोजपूर या दोन ठिकाणी धार्मिक कार्यक्रम संपवून हे बारा जण प्रवासाला निघाले आहेत. ते मूळचे तेलंगाना येथील आहेत. हरियाणातील धार्मिक कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी नऊ दिवसांपूर्वी तेथील महसूल यंत्रणेकडून एक परवाना घेऊन प्रवास सुरु केला आहे. खरे तर ते आतापर्यंत तेलंगानात जाणे आवश्यक होते. पण ते गुरुवारी निलंगा येथे आले. एका ठिकाणी राहिले. याची कानोकान खबर कोणालाच मिळाली नाही. पण शुक्रवारी मात्र परराज्यातील बारा व्यक्ती निलंग्यात येऊन थांबल्याची माहिती सर्वत्र पसरली. महसूल प्रशासन व पोलिसानाही याची माहिती मिळताच त्यांची झोपच उडाली. तातडीने या व्यक्ती ज्या ठिकाणी राहिल्या त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली. त्यांना ताब्यात घेतले आहे.

त्याच्याकडून हरियाणातून घेण्यात आलेला परवान्याची शहानिशा करण्यात आली आहे. आता त्यांना चौदा दिवस क्वॉरन्टाईन करण्यात येणार आहे. खरे तर देशात टाळेबंदीचा काळ सुरु आहे. परराज्यातील कामगारांची सोय देखील संबंधीत राज्ये व त्यांचे जिल्हा प्रशासन त्या-त्या ठिकाणी करीत आहे. घरातून बाहेर पडू नका असे आवाहन सातत्याने करण्यात येत आहे. असे असताना हरियानातून धार्मिक कार्यक्रम करून तेलंगानाला जाण्यासाठी हे बाहेर आलेच कसे, त्यांना वाहन कसे मिळाले, त्यांनी किती राज्यातून जिल्ह्यातून प्रवास केला आहे तेथे का त्यांना आडवण्यात आले नाही असे अनेक प्रश्न आता या निमित्ताने उपस्थितीत होत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT