infection  sakal
मराठवाडा

viral infection : घरोघरी ‘आजीबाईच्या बटव्याचा’ शोध सुरू

सर्दी, पडसे, खोकल्याने नागरिक त्रस्त

सकाळ वृत्तसेवा

जालना : सध्या वातावरणात कधी थंडावा, तर उकाड्याचा अनुभव येत आहे. एकीकडे हिवाळ्याची चाहूल तर दुसरीकडे संसर्गजन्य आजाराने नागरिक त्रस्त असल्याचे चित्र शहरात मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. शहरातील अनेक दवाखाने फुल्ल झाले आहेत.जुन्या काळात असलेल्या ‘आजीबाईंच्या बटव्याचा’ शोध घेतला जात आहे. अशा बदलत्या वातावरणाने घशाला जास्त संसर्ग होत असल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण आहे.. अनेक नागरिक दवाखान्यात औषधोपचार घेऊन थकले, परंतु सर्दी, खोकला आणि पडसे मात्र निघून जाण्याचे नाव घेत नसल्याने घरगुती इलाजाकडे नागरिक वळले आहेत, हे विशेष.

दरवर्षी पेक्षा यंदा लांबलेला पावसाळा आणि सध्या हिवाळ्याची चाहूल लागत आहे.सततच्या बदलत जाणाऱ्या वातावरणाने संसर्गजन्य आजार बळावत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सकाळी थंडी असते,तर दुपारी कडक उन्ह यासह सायंकाळी उकाडा जाणवतो म्हणून पंखे लावावे लागत असल्याचे चित्र घरोघरी दिसून येत आहे. अशा बदलत्या वातावरणात तेलकट, आंबट, थंड असलेले फळे आणि पदार्थ खाण्यात आल्याने घशाला संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त वाढत आहे. त्यातही घशाला संसर्ग होऊन सर्दी, पडसे,ताप येणे,अंगदुखी, डोकेदुखी,खोकला बळावत आहे. शहरात घरोघरी सर्दी, पडसे,खोकल्याने नागरिक त्रस्त झाल्याचे चित्र दिसून येत असल्याने अनेक दवाखान्यात गर्दी दिसून येत आहे. थंड वातावरणात घशाला जास्त संसर्ग होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सर्दी, पडसे आणि खोकला असलेल्या अनेक रुग्ण दवाखान्यात दाखल होऊन उपचार घेऊन पंधरा पंधरा दिवस उलटले तरी बरे वाटेना,असे नागरिकांचे अनुभव आहेत.

घशाला संसर्ग...

वातावरणात बदल किंवा थंड वातावरण असेल तर घशाला कोरड पडते,संसर्ग वाढतो. घशाचा संसर्ग वाढला,की आत तोंडाला आणि इतर ठिकाणी परिणाम होतो. ऐन थंड वातावरणात केळी, पेरू, सीताफळ सारखे फळे खाणे, दूध पिणे यासह थंड फळे खाल्याने सर्दी, खोकला आणि पडसे होते.

हे टाळावे...

थंड दूध पिऊ नये

आंबवलेले पदार्थ जास्त खाऊ नयेत

तेलकट, मसाल्याचे पदार्थ टाळावेत

दुधाचे पदार्थ खाण्यात

टाळावेत

आजीबाईचा बटवा...

चहात तुळशीची पाने वापरणे

भाजीत मिरे, विलायची, आल्याचा वापर करणे

चहा (दूधविरहित) काळा घेणे

तुरटीच्या पाण्याने गुळणी करणे

अद्रक, तुळशी,अडुळसा पाने, सूंठ,गूळ मिश्रित काढा

वातावरणात कमालीचा बदल होत आहे.याचा परिणाम आरोग्यावर होतो.थंड वातावरण असल्याने सर्दी, पडसे,खोकला येतोच.दुधाचे पदार्थ जास्त खाल्यास चिकट कफ तयार होतो, यामुळेच ताप आणि इतर विकार होतात. संसर्ग टाळावेत यासाठी चहात तुळस,अडुळसा, विलायची टाकावी. चहा किंवा भाजीत आले टाकले तरी फरक पडतो. थंड पदार्थ आणि फळे,तेलकट, आंबट पदार्थ टाळावेत.

- आकाश धुळे आयुर्वेद तज्ज्ञ,जालना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT