kalva
kalva 
मराठवाडा

कालव्यात पाणी तरीही शेतकऱ्यांत चिंता 

राजेश दारव्हेकर

हिंगोलीः पावसाच्या उशिरा झालेल्या आगमनामुळे प्रारंभी रब्बीसाठी पाणी मिळेल की नाही ? ही चिंता असतानाच पावसाने लावलेली उशिरापर्यंतची हजेरी ही जिल्ह्यातील जलप्रकल्पांसाठी आनंदाची बाब ठरली. यामुळे औंढा तालुक्यातील सिध्देश्वर धरण तब्बल तेरा वर्षानंतर भरले. याचा फायदा होईल या विचारात असलेल्या शेतकऱ्यांच्या आनंदावर मात्र कालव्याच्या परिसरात वाढलेल्या झाडा-झुडपामुळे विरजन पडले आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. 

औंढा नागनाथ तालुक्‍यातील सिध्देश्वर धरणाच्या जाणाऱ्या कालव्याची दुरवस्‍था झाली असून जागोजीगाचे सिमेंट निघाले असून त्‍यात झाडे झूडूपे वाढली आहेत. तेरा वर्षानंतर हे धरण शंभर टक्‍के भरल्याने यावर्षी पाणीपाळ्या दिल्या जाणार असल्याने कालव्याच्या दुरूस्‍तीची कामे अपेक्षीत आहेत. 

तब्बल १३ वर्षानंतर भरले धरण

औंढा तालुक्यातील सिद्धेश्वर धरण तब्बल १३ वर्षानंतर यावर्षी झालेल्या परतीच्या पावसाने शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे या परिसरातील दरवर्षीच्या तुलनेत सिंचन क्षेत्र वाढले आहे. कालव्याला पाणी सोडणार असल्याचे शेतकऱ्यांच्या आशा पल्‍लवीत झाल्याने रब्‍बीच्या पेरण्या देखील मोठ्या प्रमाणावर झाल्या आहेत. आता शेतकऱ्यांचे पाणी पाळीकडे लक्ष लागले आहे. 

या गावातून जातो कालवा

सिध्देश्वर धरणातून जाणारा कालवा सुखापुरी ब्राह्मणवाडा, गोळेगाव, अंजनवाडी, माथा, जवळा बाजार आदी भागातून जातो. तसेच जवळा बाजार भागातून करंजाळा मार्गेने एक मायनर कालवा देखील जातो. यामुळे हजारो हेक्‍टर जमीन सिंचनाखाली आली आहे. पंचवीस ते तीस वर्षांपासून या कालव्याची दुरवस्‍था झाली आहे. हा कालवा जागोजागी फुटला असल्यामुळे या कालव्यातून हजारो लिटर पाणी वाया जाते.

पाणी वाया जाण्याची शक्यता
 
या कालव्यामुळे शेतकऱ्यांसह पाटबंधारे विभागाला मोठा फायदा होतो. शेतकरी रब्‍बीसह उन्हाळी भुईमुगाचे पिक या पाण्यावर घेतात. यावर्षी धरणात जमा झालेल्या पाणीसाठ्यामुळे कालव्याला पाणी सोडले जाणार असल्याने शेतकऱ्यांनी रब्‍बीची पेरणी मोठ्या प्रमाणावर केली आहे. मात्र, जागोजागी दुरवस्‍था झालेल्या कालव्याची दुरूस्‍ती करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा कालव्याला पाणी सोडल्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाणार असल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यामुळे पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष देवून कालव्याची दुरूस्‍ती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींनी रायबरेली निवडल्यानं निरुपम यांचा हल्लाबोल; म्हणाले, पळून गेले...

SRH vs RR, IPL 2024: 'भयानक अंपायरिंग...', हेडची बॅट हवेत होती असं सांगत माजी भारतीय क्रिकेटरने थर्ड अंपायरवर साधला निशाणा

Anil Navgane Attack: ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला, भरत गोगावलेंच्या पुत्रासह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

Gautam Adani: कोण आहेत गौतम अदानींचे राईट हँड? डॉक्टर ते उद्योगपती असा आहे प्रवास; चालवतात 20,852 कोटींची कंपनी

Parineeti Chopra : पतीसाठी परिणीतीच्या लंडनला फेऱ्या; राघववर पार पडली मोठी शस्त्रक्रिया

SCROLL FOR NEXT