मराठवाडा

जाहीर करूनही सोडले नाही गोदापात्रात पाणी

चंद्रकांत तारु

पैठण ( जि.औरंगाबाद) : गोदाकाठावरील गावांना पिण्यासाठी जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याचे रविवारी (ता. 11) जाहीर करूनही गोदापात्रात पाणी न सोडल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. जायकवाडी धरण प्रशासन व तालुका प्रशासनाच्या गोंधळामुळे ही नाचक्कीची वेळ आली आहे. गोदापात्रातील आपेगाव, हिरडपुरी या बंधाऱ्यांत पाणी सोडण्यात येणार होते.

बंधाऱ्यात पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी अनेकवेळा केली असून, आंदोलने केली आहेत. परंतु आता पाणी उपलब्ध असूनही बंधाऱ्यात पाणी सोडण्याबाबत विनाकारण उशीर केला जात असल्याने प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा शेतकरीवर्गातून निषेध होत आहे. धरणात नाशिक जिल्ह्यातील गोदावरीच्या महापुराचे पाणी दाखल झाल्याने धरणाचा पाणीसाठा वाढला असून, या पाणीसाठ्याची पातळी 83 टक्के झाली आहे. त्यामुळे धरण प्रशासनाने धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यात पाणी सोडले आहे.

या पार्श्वभूमीवर गोदापात्रातील आपेगाव, हिरडपुरी या बंधाऱ्यांत पाणी सोडण्याची मागणी जोर धरीत आहे. या बंधाऱ्याच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या गोदाकाठावरील चाळीस गावांतील पिण्याच्या पाण्याचा व जनावरांचा पाणीप्रश्न सुटणार असल्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे या आनंदावर विरजण पडले. धरण प्रशासनाची हमी देऊन तहसीलदार महेश सावंत यांनी धरणावरील जलविद्युतनिर्मिती केंद्रातून दोन्ही बंधाऱ्यांत साडेअकराला पाणी सोडण्यात येणार असल्याचे जाहीर केले. ही वार्ता सोशल मीडियाच्या माध्यमातून तालुकाभर पसरली. गोदाकाठच्या भागातील शेतकरी, ग्रामस्थांनी जायकवाडी धरणाच्या दिशेने मोठ्या संख्येने जाऊन जलविद्युत केंद्राकडे गर्दी केली. ठरलेली साडेअकराची वेळही झाली. परंतु पाणी काही सोडले गेले नाही. काही तांत्रिक बाब समजून शेतकऱ्यांनी प्रतीक्षा केली तरीही पाणी सोडले नाही. त्यामुळे काय करावे, किती वेळ थांबावे, असा प्रश्न पडला. शेवटी चार तासांच्या प्रतीक्षेनंतर संतप्त होऊन शेतकरी परतले.

राजकीय नेते गेले कुठे?

आपेगाव, हिरडपुरी येथील बंधाऱ्यांत पाणी सोडण्याची मागणी करणारे राजकीय पक्षांचे नेते आज मात्र पाणी सोडण्याप्रसंगी शेतकरी एकवटले असताना अनुपस्थित होते. त्यामुळे ही नेतेमंडळी गेली कुठे, अशी चर्चा येथे ऐकायला मिळाली. आमदार संदीपान भुमरे, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष दत्ता गोर्डे, शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी या नेत्यांनी मागणी लावून धरली होती. जाहीर केलेले पाणी सोडण्यासाठी अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यासाठी ऐनवेळी नेते नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT