well
well 
मराठवाडा

विहिरी आटल्या, पिके वाळली 

सकाळवृत्तसेवा

जातेगाव : भाजीपाल्याचे अधिक उत्पादन घेण्यात येणाऱ्या भेंडटाकळी शिवारात यंदा हिवाळ्यात पिण्याचे पाणी गायब झाले असून, शेतशिवारांना वाळवंटारखे भयाण रूप प्राप्त झाले आहे. खरीप हंगामात केलेल्या खर्चाइतपत उत्पन्न मिळाले नाही. उन्हाळी परिस्थिती निर्माण झाल्याने गावातील युवक आणि शेतमजुरांनी इतरत्र रोजंदारीसाठी स्थलांतर केले आहे. 

भेंडटाकळी आणि तांड्यासह साधारण तीन हजार लोकसंख्या असणारे गाव शेती करून कुटुंबाची जबाबदारी संभाळून उपजीविका भागवितात. खरिपात कापूस, सोयाबीन, मूग, तर रब्बी हंगामात ज्वारी, गहू आणि हरभरा या पिकांना शेतकरी प्राधान्य देतात. याशिवाय भाजीपाला उत्पादनात अग्रेसर असलेल्या भेंडटाकळी शिवारात यंदा हिवाळ्यातच उन्हाळ्यासारखी परिस्थिती झाली आहे. गावातील विहीर, बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. परिणामी, भरहिवाळ्यातच पिण्याच्या पाण्यासाठी शेतशिवारांतील पाणी असलेल्या विहिरींचा शोध घेत ग्रामस्थांची भटकंती सुरू झाली आहे.

शेतजमिनीत असलेल्या विहिरी आणि बोअरवेलचा पाणीसाठा कमी झाला. यामुळे लागवड करण्यात आलेला टोमॅटो, कोबी यांसारखा भाजीपाला जळून खाक झाला. आठवड्याला हातात मिळणारा पैसा बंद झाला. शिवाय रोजंदारी मिळत नाही. यामुळे गावातील शेकडो युवक यांनी रोजंदारीसाठी शहरांकडे स्थलांतरित झाले, तर तांड्यावरील सर्वच कुटुंबांनी हातात कोयता घेतला. यामुळे तांडा ओस पडला आहे. 

दरम्यान, भेंडटाकळी येथे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असला तरी टॅंकरचे पाणी गावातील बारवांमध्ये सोडण्यात येते. टॅंकर येताच बारवेभोवती शालेय विद्यार्थी आणि महिला यांची गर्दी होते. चाराटंचाई प्रश्न गंभीर झाला आहे. यामुळे शेतकरी पशुधनाची भूक भागविण्यासाठी वैरणीसाठी भटकंती करीत आहेत. 

भेंडटाकळी शिवारात यापूर्वीच्या दुष्काळापेक्षा यंदाचा दुष्काळ भयाण ठरला आहे. भाजीपाला लागवड करून हातात आठवड्याला पैसा मिळत होता; परंतु यावर्षी हिवाळ्यातच उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने लागवड केलेला भाजीपाला खाक झाला. रोजंदारीसाठी इतरत्र स्थलांतर करण्याची वेळ गावातील शेतकरी, शेतमजुरांवर आली आहे. 
- मोहन लोंढे, शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Josh Baker: क्रिकेटविश्वात शोककळा! इंग्लंडच्या 20 वर्षीय खेळाडूचे निधन, काउंटी संघाने दिली माहिती

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT