himaytnagr.jpg 
मराठवाडा

पाण्याविना पैनगंगा आटली

प्रकाश जैन


हिमायतनगर, (जि.नांदेड) ः तालुक्यातून वाहनारी पैनगंगा नदी कोरडी ठाक पडली असून नदीकाठांवरील नागरिकांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागते आहे. ग्रामीण भागात जनावरांनासुद्धा पिण्याचे पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांना दुहेरी संकट ओढवलेले दिसत आहे. तरी इसापूर धरणातून पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडवे, अशी मागणी नदीकाठांवरचे शेतकरी करीत आहेत.

शेतकऱ्यांपुढे मोठे संकट
तालुक्यातून वाहनाऱ्या पैनगंगा नदीकाठांवरती शेलोडा, शिरपल्ली, धानोरा, बोरगडी, बोरगडी तांडा, वारंगटाकळी, पळसपूर, डोल्हारी, घारापूर, टेंभुर्णी अशी अनेक गावे आहेत. या सर्व गावांची तहान भागवणारी नदी ही पैनगंगाच असून मात्र, गेल्या एक महिन्यापासून नदीपात्रात एकही थेंब पाणी नसल्याने गुराढोरांसह नागरिकांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. तरी सुद्धा पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकलेले दिसत आहे.

शेतकऱ्यांनी नदीपात्रात पाणी राहील या आशेवर मोठ्या प्रमाणावर शेतात उन्हाळी ज्वारी व भुईमुगाची पेरणी केली. मात्र, नदीपात्रात पिकांना पाणी देण्यासाठी पाणीच नसल्याने हाता तोंडशी आलेली पिके कोजमून गेली आहेत. पिके तर गेली मात्र, गुराढोरांना तरी पाणी सोडा, अशी मागणी बळिराजा करीत आहे. तरी जिल्हाधिकारी यांनी इसापूूूर धरणातून पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडवे, अशी मागणी नदीकाठावरील शेतकरी करीत आहेत.

शेतकऱ्यांनी काय करावे हे सूचत नाही
आमच्या गुराढोरांना पाण्यासाठी पाणी नाही. कोसो दूर पाण्यासाठी भटकंती करून सुद्धा पाणी मिळत नसल्याने आम्ही शेतकऱ्यांनी काय करावे हे सूचत नाही. तरी जिल्हाधिकारी साहेबांनी इसापूर धरणातून पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडावे अशी मागणी राजू पाटील शेतकरी शेलोडा यांनी केली. तसेच आमची उन्हाळी ज्वारी व भुईमुगाचे पाक पाण्यावाचून गेले. मात्र, गुराढोरांना तरी पाणी सोडा, नाही तर आम्हाला गावे सोडण्याची वेळ येईल. जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन पैनगंगा नदीपात्रात इसापूर धरणातून पाणी सोडावे अशी मागणी प्रकाश वानखेडे, शेतकरी, पळसपूर यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधानसभेनंतर महाराष्ट्रात १५ लाख नवमतदार वाढले, एकही आक्षेप नाही; बीएमसीत एकूण मतदार पोहोचले १ कोटीच्या वर

Deputy Chief Minister Ajit Pawar: राहुल गांधींच्या आरोपात तथ्य नाही: उपमुख्यमंत्री अजित पवार; 'हरल्यावरच ईव्हीएमची आठवण येते, जिंकल्यावर नाही'

Latest Marathi News Updates : पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार महेश राखचा खून करून संशयितांचे मिरजेकडे पलायन

Nandurbar News : नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांची आदर्श कृती; जुळ्या मुलांचा सरकारी शाळेत प्रवेश, पाहा व्हिडिओ

Asia Cup 2025 : अफगाणिस्तानविरुद्ध सामना सुरू असतानाच वडिलांचं निधन, श्रीलंकेच्या खेळाडूवर दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT