Osmanabad Osmanabad
मराठवाडा

'शासनाने दखल घ्यावी...' आत्महत्येपूर्वी केलेल्या व्हिडिओत शेतकऱ्याने केली होती विनंती

मंगळवारी हैदराबाद येथे उपचार सुरू असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे

वैभव पाटील

मंगळवारी त्यांच्यावर हैदराबाद येथे उपचार सुरू असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे

निपाणी (उस्मानाबाद): येथील शेतकरी अशोक राजेंद्र गुंड (वय २९) यांनी (ता. २०) विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मंगळवारी (ता.२३) त्यांच्यावर हैदराबाद येथे उपचार सुरू असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अशोक गुंड हे सोयाबीन पिकाच्या नापिकीने हवालदिल झाले होते. विषप्राशन करण्यापूर्वी त्यांनी व्हिडिओ करून तो सोशल मेडियावर अपलोड केला होता. गुंड यांनी या व्हिडिओमध्ये प्रशासनाला विनंती केली होती. त्यामध्ये, शासनाने सोयाबीनचे पंचनामे करून पाहणी करावी. पाडोळी, शिराढोण, निपाणी शिवारातील पिके पावसाअभावी धुरळा (करपून) होऊन गेली आहेत. या पिकात जनावरे सोडण्याची पाळी शेतकऱ्यांना आली आहे. गेल्या २५ दिवसांपासून पाऊसासोबत लाईट नाही, याची प्रशासनाने लवकर दखल घ्यावी अशी विनंती केली होती.

स्वतःचा सोयाबीन उपटून टाकला असून, या प्लॉटमध्ये काहीही राहिले नाही असेही गुंड या व्हिडिओत म्हणताना दिसत आहेत. आता शेतकऱ्यांवर सोयाबीनमुळे उपासमारीची वेळ आली असून याकडे विमा कंपनी व शासनाने लक्ष देऊन पंचनाम्याची करण्याची गरज असल्याचेही त्यांनी व्हिडिओमध्ये मत मांडले होते. हा व्हिडिओ व्हायरल करूनही प्रशासनाला जाग आली नाही. अखेर या नैराश्यातून त्यांनी विषप्राशन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Politics : राज ठाकरेंनी अपमान केलेल्या अभिनेत्याचा भाजप प्रवेश

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

Gorakhpur Mumbai Train Bomb Threat : गोरखपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये बॉम्बची धमकी; प्रवशांमध्ये खळबळ अन् शोधमोहीम सुरू

SCROLL FOR NEXT