मुंबई

मुंबईतील 2 हजार 230 इमारती कोविडमुक्त; प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या संख्येत वाढ 

समीर सुर्वे

मुंबई : कोविडचा संसर्ग कमी होऊ लागला असून, गेल्या 14 दिवसांत 2 हजार 230 इमारती कोविडमुक्त झाल्या आहेत. मात्र प्रतिबंधित इमारतीत राहणाऱ्या नागरिकांची संख्या 1 लाख 90 हजारने वाढली आहे. 

मुंबईतील कोविड रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 200 दिवसाच्या पुढे गेला आहे. तर सर्वच प्रभागातील संसर्गाचा दरही 0.50 टक्‍क्‍यांच्या खाली आला आहे. 24 ऑक्‍टोबर रोजी मुंबईतील 8 हजार 503 इमारतींमध्ये कोविडचे रुग्ण आढळल्याने या इमारती सिल करण्यात आल्या होत्या. या इमारतींमध्ये 8 लाख 90 हजार नागरिक राहत होते. शुक्रवारी (ता.7) 6 हजार 273 इमारतीत कोविडचे रुग्ण असल्याने त्या इमारती सिल करण्यात आल्या आहेत; तर या इमारतींमध्ये 10 लाख 8 हजार नागरिक राहत आहेत. प्रतिबंधित इमारतींची संख्या 2 हजार 230 ने घटली आहे. मात्र या इमारतींमध्ये राहाणाऱ्या नागरिकांची संख्या तब्बल 1 लाख 90 हजारने वाढली आहे. पालिका सध्या रुग्ण आढळल्यावर पूर्ण इमारत प्रतिबंधित न करता ती विंग प्रतिबंधित करते. त्यामुळे एकाच इमारतीत वेगवेगळ्या विंगमध्ये राहणारे रुग्ण आढळू लागल्याने प्रतिबंधित इमारतीत राहणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. 

124 वस्त्या कोविडमुक्त 
मागील 14 दिवसांत 124 वस्त्या कोविडमुक्त झाल्या आहेत. 24 ऑक्‍टोबर रोजी 632 वस्त्या आणि चाळींमध्ये कोविडचे रुग्ण आढळले होते. ती संख्या आता 509 पर्यंत खाली आली आहे. 
. -----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train: प्लॅटफॉर्मवर पाऊल टाकताच जीव धोक्यात! मुंबईतलं 'हे' स्थानक बनलंय मृत्यूचा अड्डा? चार वर्षांची हादरवणारी कहाणी

Accident News: भीषण अपघातात भावाचा जागीच मृत्यू; बारावीचा पेपर देऊन बहिणीला घरी नेताना घटना, आई-वडीलांचा आक्राेश!

Nagpur Accident: पिकअपच्या धडकेत महिलेचा मृत्यू; पती गंभीर तुमसर-रामटेक मार्गावरील घटना

T20 World Cup Ind vs Namibia : मोठ्या विजयाचे भारताचे ध्येय; नामिबियाविरुद्ध अभिषेक शर्मा मुकण्याची शक्यता

Maharashtra political news : ‘राष्ट्रवादी’च्या विलीनीकरणाला खो! दिल्लीतील दोन मोठ्या नेत्यांच्या सल्ल्यानंतरच निर्णय

SCROLL FOR NEXT