मुंबई

21 ऑगस्टला 'इव्हीएम हटाव' आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : 'इव्हीएम-व्हीव्हीपॅट'च्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकवटले असून, 21 ऑगस्टला 'इव्हीएम-व्हीव्हीपॅट हटवा,लोकशाही वाचवा',चा नारा देत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या सर्व पक्षीय पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. 'इव्हीएम'च्या विरोधातील या आंदोलनात भाजप-शिवसेनेने ही यावे. त्यांना जर आपल्या जिंकण्यावर एवढ्या विश्वास असेल तर मग त्यांनी बॅलट पेपरवर निवडणुका घेण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हानच राज ठाकरे यांनी भाजप-शिवसेनेला दिले.

21 ऑगस्टच्या आंदोलनाच्या इव्हीएमबाबत जनतेकडून नेमक्या काय भावना आहेत, हे जाणून घेण्यासाठी फॉर्म भरून घेतले जाणार आहे. हे फॉर्मनंतर निवडणूक आयोगाला सादर करण्यात येतील, अशी माहितीही राज ठाकरे यांनी दिली. या आंदोलनात कोणत्याही राजकीय पक्षाचे नाव किंवा झेंडा नसेल असेही राज म्हणाले.

कर्नाटक, मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांच्या प्रश्नावर बोलताना राज म्हणाले, की भाजपचे प्रथम लक्ष हे केंद्रात सत्ता स्थापन करणे होते. म्हणून त्यावेळी त्यांनी तसा भास निर्माण केला होता. गेल्या निवडणुकीत 371 मतदार संघामध्ये 55 लाखांहून अधिक मतांचा गोंधळ झाला होता. मुख्यमंत्र्यांना विश्वास असेल तर त्यांनी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यास सहमती दशवावी, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले. ममता बॅनर्जी यांनी याबाबत सहमती दर्शवली असल्याचे ही राज यांनी सांगितले.

यावेळच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा धक्का ज्येष्ठ पत्रकार, राजनितीज्ञाना बसला. देशात निर्माण झालेल्या संभ्रमावस्थेची जबाबदारी निवडणूक आयोगाची व सरकारची आहे. जनतेने आमच्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute : दोन्ही गटांना नवे नाव, चिन्हे का दिली नाहीत? शिवसेना पक्षाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

India ODI Squad : भारताच्या वनडे संघात Rishabh Pant ला का मिळाली नाही संधी? ही असू शकतात ३ महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Update : पुण्यात एफडीएची मोठी कारवाई!५६ लाखांचा अन्नसाठी जप्त

Gokul Milk Union : गोकुळमधील अवसायनातील संस्थांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळली; ४९२ संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम

‘देवमाणूस’नंतर किरण गायकवाडची नवी इनिंग; राजकारण अन् गुन्हा… ‘एफआयआर नं. ४६९’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार?

SCROLL FOR NEXT