विरार -:भाईंदर पश्विमेच्या रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या परीसरात चार खाजगी बस पूर्ण जळून खाक झाल्या आहेत. शनिवारी पहाटे 6 च्या सुमारास ही घटना घडली. ही आग नक्की कशाने लागली याचे कारण समजू शकले नाही. तरी कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे बस जळाल्या असाव्यात अशी शक्यता अग्निशमन दलाने व्यक्त केली आहे.
भाईंदर पश्विम परिसरात मोठ्या प्रमाणात खाजगी बस गाड्या उभ्या असतात. शनिवारी पहाटे ५ च्या सुमारास चार बस गाडयांना आग लावून पेटवून टाकण्यात आल्या. लागल्याचा प्रकार घडला.या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीत आटोक्यात आणली. आग कुणी आणि का लावली त्याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. अधिक तपास भाईंदर पोलीस करत आहेत.
4 private buses burnt in Bhainder
-----------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.