मुंबई

राज्यात मे अखेर जैविक कचऱ्यात 45 टक्के वाढ;  एमपीसीबीचा अभ्यास; कोव्हिडचा परिणाम झाल्याचे स्पष्ट 

सकाळ वृत्तसेवा


मुंबई : कोव्हिड पूर्वच्या तुलनेत मे महिन्याअखेर राज्यात 45 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक जैविक कचरा तयार झाला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) केलेल्या अभ्यासानुसार हे स्पष्ट झाले आहे. जैविक कचऱ्याची 21 मार्च ते 1 जून दरम्यान तुलना केली आहे. 
"पर्यावरणीय गुणधर्मांवर कोव्हिड परिणाम' असा अभ्यास एमपीसीबीने सुरू केला होता. राज्यभरातील 6 हजार 410 आरोग्य संस्थांकडून घेतलेल्या माहितीच्या आधारे हा अहवाल तयार केला आहे. 

गेल्या वर्षी सरासरी 62.4 टन जैविक कचरा तयार झाला होता. या वर्षाच्या मे अखेर वाढून दर दिवशी 90.6 टन झाला आहे, असे या अभ्यासात दिसून आले आहे. एमपीसीबीच्या मते, राज्यात 31 जैविक कचरा प्रक्रिया आणि विल्हेवाट सुविधा आहेत. 
या अभ्यासातून राज्यभरातील शहरी स्थानिक संस्थांमधून निर्माण होणाऱ्या दैनंदिन घनकचऱ्यात थोडीशी घसरण झाली असल्याचे समोर आले आहे. विशेषत: एप्रिलमध्ये बांधकाम आणि व्यावसायिक कचऱ्याचे प्रमाण नगण्य आहे. 
कचऱ्याचे प्रमाण कमी होण्यामागे दोन मुख्य कारणे असू शकतात. एक म्हणजे मुंबईतील अनेक सार्वजनिक 
ठिकाणे बंद आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात मुंबईतून स्थलांतरण झालेले आहे. त्यामुळे कचरा जमा होण्याचे प्रमाण कमी झाले असेल असे या अहवालात म्हटले आहे. 

मे महिन्यामध्ये किंवा लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात पॅकेजिंग संबंधित कचऱ्यामध्येही अभ्यासानुसार वाढ झाली आहे. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात ऑनलाईन व्यवहाराद्वारे घरपोच साहित्य परवानगी देण्यात आली. त्यामुळे अशा कचऱ्यात वाढ झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT