Mantralay 
मुंबई

CM ठाकरे भाषण संपवून निघताच शेतकऱ्याने अंगावर ओतलं रॉकेल अन्…

नामदेव कुंभार

मंत्रालयाबाहेर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमोहत्सव सोहळ्यादिवशीच मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल टाकत शेतकऱ्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाषण संपवून निघाले होते. परिस्थितीचं गांभिर्य ओळखून पोलिसांनी वेळीच त्या शेतकऱ्याला रोखत मोठी दुर्घटना टाळली. मिळालेल्या माहितीनुसार, आत्मदहनाचा प्रयत्न करणारा शेतकरी जळगावचा आहे. या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून चौकशी सुरु आहे.

रविवारी सकाळी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर काही वेळानंतर शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा हा प्रकार घडल्यानं खळबळ उडाली. या शेतकऱ्यानं असं का केलं? याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, या शेतकऱ्याचं नाव सुनील गुजर असं आहे. मका आणि सोयाबीन व्यवहारात आडकाठी होत असल्याचं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि यातूनच या शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचलत मंत्रालय परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न केला. मंत्रालयात ध्वजारोहण करून मुख्यमंत्री बाहेर पडल्यानंतर, वाहतूक सुरळीत झाली व सुरक्षा व्यवस्थेत थोडी शिथिलता आल्यानंतर शेतकऱ्याने मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. परिस्थितीचं गांभिर्य पाहून उपस्थित पोलिसांनी त्या शेतकऱ्याला रोखलं आणि अनर्थ टळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT