indian economy 
मुंबई

Lockdown : उद्योजकांच्या मते भारतीय अर्थव्यवस्था रुळावर येण्यास लागणार इतका कालावधी, वाचा

सकाळवृत्तसेवा

मुंबई : लॉकडाऊन देशवासियांच्या आरोग्यासाठी हितकारक असला तरी त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा आघात झाला आहे. यातून सावरण्यास किमान एक वर्ष लागेल, असा अंदाज देशातील उद्योजकांनी सीआयआयच्या सर्वेक्षणात व्यक्त केला आहे. 

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीतर्फे देशातील तीनशे कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी बोलून हे सर्वेक्षण करण्यात आले. यापैकी दोन तृतीयांश व्यावसायिक हे  सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांमधील आहेत. या वर्षात आपला नफा कमी होईल; तसेच अर्थव्यवस्थेचे गाडे रुळावर येण्यास आणि मागणी पूर्ववत होण्यास वर्ष लागेल, असा सर्वसाधारण निष्कर्ष सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे. 

यंदा एप्रिल ते जून तिमाहीत कंपन्यांचा महसूल 40 टक्के कमी होईल, असे 65 टक्के उद्योजकांचा अंदाज आहे. महसूल 40 टक्क्यांहून अधिक कमी होईल असे 33 टक्क्यांना वाटते; तर महसुलातील घट 20 ते 40 टक्के असेल, अशी शक्यता 32 टक्के व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. लॉकडाऊन संपल्यानंर वर्षभराने अर्थव्यवस्था पूर्ववत होईल, अशी अपेक्षा 45 टक्के व्यावसायिकांना आहे. त्यातही आपल्या कंपनीची अवस्था सहा ते बारा महिन्यांत सुधारेल, असा विश्वास 34 टक्के व्यावसायिकांना आहे. लॉकडाऊन उठल्यानंतर  एका वर्षात पुन्हा मागणी पूर्ववत होईल, असा अंदाज अनेकांनी वर्तवला आहे. 

लाॅकडाऊननंतर कर्मचारी कपात
लॉकडाऊननंतर आपापल्या क्षेत्रात नोकऱ्या कमी होतील, असे मत 54 टक्के व्यावसायिकांनी व्यक्त केले आहे. तर, नोकऱ्या 30 टक्क्यांनी कमी होईल,असा अंदाच 45 टक्के व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे; मात्र अद्याप कंपनी पगारकपात झाली नसल्याचे दोन तृतीयांश उद्योजकांनी सांगितले.

 According to entrepreneurs, it will take a long time for the Indian economy to get back on track

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट रचणारा अमोल खुणे नेमका कोण? जुना सहकारी सुपारीबाज कसा झाला?

Solapur Factory : प्रथमेश पाटील यांना संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे स्वीकृत संचालक म्हणून नियुक्ती!

Richa Ghosh DSP Appointment : विश्वविजेती रिचा घोष आता थेट ‘DSP’ ; 'बंग भूषण' पुरस्काराने देखील सन्मानित!

स्कॅमर्सनी LinkedIn वर बनवला अड्डा! Commonwealth च्या नावाखाली लोकांची होतीये लूट, तुम्ही पण लिंक्डइनवर असाल तर हे काय आहे बघाच

Latest Marathi News Live Update : पुणे व मुंबईतील जमीन व्यवहारांची श्वेतपत्रिका काढा - हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT