मुंबई

विनाकारण बाहेर पडणे महागात; पोलिसांनी वाहनेही केली जप्त

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनचालकांना पकडण्याची कारवाई सुरू केली आहे. गेल्या आठवड्यामध्ये विनाकारण वाहन घेऊन फिरणाऱ्या 200 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. एकूण 332 लोकांना ताब्यात घेतले. तसेच 250 वाहने जप्त केली.  


कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हा एकमेव उपाय असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लोकांनी आपापल्या घरात राहणे गरजेचे आहे. शासनाने यासंदर्भात लागू केलेल्या आदेशाचे काटेकोर पालन व्हावे यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.


पोलिसांनी मागील आठवड्याभरात सुमारे 200 गुन्हे दाखल केले आहेत. तसेच एकूण 332 लोकांवर कारवाई केली. 250 वाहने जप्त केली आहेत. यातील परिमंडळ-1 मध्ये 117 गुन्हे दाखल असून, 140 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच 70 वाहने जप्त करण्यात आली आहेत. परिमंडळ-2 मध्ये 80 गुन्हे दाखल असून, 192 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच 180 वाहने जप्त केली आहेत. नवी मुंबई पोलिसांकडून सुरू असलेल्या या कारवाईनंतरदेखील अनेक नागरिक वाहन घेऊन विनाकारण फिरत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Liam Livingstone ला १३ कोटी देण्याची खरच गरज होती का? काव्या मानरच्या निर्णयावर होतेय टीका, मोहम्मद शमीचं नाव ओढलं जातंय... कारण

Kalyan Dombivli Elections: कल्याण डोंबिवलीत ठाकरे एकजुटीचे राजकीय संकेत; महापालिका रणधुमाळीपूर्वी हालचालींना वेग

Ambani gifts Lionel Messi : अनंत अंबानींकडून मेस्सीला 11 कोटींचं घड्याळ भेट! एवढं महाग का आहे Richard Mille घडयाळ? काय आहे खास?

Germany Jobs: ‘मेड इन महाराष्ट्र’ मनुष्यबळाला जर्मनीचे दरवाजे बंद? १० हजार तरुणांचे भविष्य टांगणीला

Nashik Marathi Vishwa Sammelan : नाशिकमधील 'मराठी विश्व संमेलन' लांबणीवर; जानेवारीअखेर किंवा फेब्रुवारीत रंगणार सोहळा!

SCROLL FOR NEXT