Aditya Thackeray
Aditya Thackeray esakal
मुंबई

Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंचे मुंबई महानगरपालिकेवर आरोप ; म्हणले पालिका... !

सकाळ डिजिटल टीम

Aditya Thackraey : मुंबईत कचऱ्याचे ढीग महिनोंमहिने पडून आहेत. मुंबईकर या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी तक्रार करत आहेत. मात्र, पालिकेच्या वॉर्डात कचऱ्याच्या समस्येचे निवारण होत नाही. मुंबई महापालिका फक्त बिल्डर लॉबी आणि कंत्राटदारांसाठी काम करते, असा आरोप शिवसेनेचे (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंग चहल यांना दिलेल्या पत्रात केला आहे.

७ मार्च २०२२ पासून मुंबई महापालिकेत लोकप्रतिनिधी नाहीत. विशेष म्हणजे १५ वॉर्डांत सहाय्यक आयुक्तांची पदे रिक्त आहेत. मुंबईकरांना एखाद्या प्रश्नी तक्रार करायची तर कुठे करायची, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रातून केला आहे.

मुंबई शहरामध्ये गेल्या ३ महिन्यांपासून अनेक नागरिकांनी संपूर्ण शहरात कचऱ्याचे ढीग वाढत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. मुंबई महापालिका संपूर्ण मुंबईमध्ये कुठल्याच विभागामध्ये कचरा गोळा करण्याचे काम नियमितपणे करताना दिसत नाही. शहरातील सर्वच वॉर्डांतील कचरा वेळेवर उचलला जात नसल्याचे खरे कारण काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुकानात चहा थोडासा थंड असला तरी लोक कानाखाली मारायचे, लहानपणी खूप अपमान सहन केला- PM मोदी

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील पार्किंगमध्ये अनेक गाड्या जळून खाक

T20 World Cup 2024 : फिल्डिंगसाठी उतरले कोच आणि सिलेक्टर, वर्ल्डकप सामन्यात टीम ऑस्ट्रेलियावर का आली अशी वेळ?

आलमट्टी धरणामुळे सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांत येऊ शकतो महापूर? CM शिंदेंनी अधिकाऱ्यांना दिल्या महत्त्वाच्या सूचना

Adani-Paytm Deal: गौतम अदानी बनणार पेटीएमचे पार्टनर; फिनटेक क्षेत्रात प्रवेश करण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT