मुंबई

अंबरनाथ MIDC मध्ये वायुगळती; नागरिकांना उग्र वास व खोकल्याचा त्रास

सकाळ वृत्तसेवा

अंबरनाथ : अंबरनाथमधील एएमपी गेट परिसरातील एमआयडीसीमधील रासायनिक कंपनीमधून शनिवारी गॅस सोडण्यात आल्याने कानसई परिसरातील नागरिकांना उग्र वासाचा आणि खोकल्याचा त्रास होत आहे. रासायनिक कारखान्यातून निघणारा वाफसदृश्य वायू बाहेर पडल्यावर पावसाच्या ढगाळ वातावरणामुळे तो वर आकाशात जाण्याऐवजी हवेच्या दाबाने पुन्हा खाली येतो. परिणामी नागरिकांना खोकल्याचा त्रास जाणवू लागतो.

शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास वायू कानसई, साई आदी विभागात पसरू लागला. मनसेचे शहर अध्यक्ष कुणाल भोईर, काँग्रेसचे नरेंद्र काळे आदींनी नागरिकांशी संपर्क साधला आणि सतर्क राहण्याची सूचना केली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून ते चौकशी सुरू करीत असल्याची माहिती  कुणाल भोईर यांनी दिली.

--------------------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता परतले विजयी मार्गावर, सॉल्टच्या तुफानी अर्धशतकानंतर दिल्लीवर मिळवला सोपा विजय

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT