मुंबई

दर्या राजा मान ह्यो तुझा दरवर्षाचा... नारळीपुनवचा...घे सांभाळून घे लेकरांना...

महेंद्र दुसार


अलिबाग: 'निसर्ग चक्रीवादळ, कोरोनासारखी संकटे दूर कर', असे साकडे घालत रायगडमधील कोळी बांधवांनी नारळीपौर्णिमेचा सण अगदी साधेपणात साजरा केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्त गर्दी न करता गावपंचाच्या उपस्थितीत समुद्राला मानाचा नारळ अर्पण करण्यात आला.

अलिबाग कोळीवाड्यातील मानाचा नारळ कोळी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते चिंतामण भगत यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. नेहमीप्रमाणे नारळीपौर्णिमेचा थाट, नाचगाणी, फटाक्यांची आतषबाजी, रंगीबेरंगी पोषक, असा कोणताही प्रकार या वेळी पाहावयास मिळाला नाही. काही मोजकीच मंडळी या वेळी उपस्थित होती. अशाच प्रकारे मोरा, मांडवा, वरसोली, मुरूड, जीवनाबंदर येथील कोळीबांधवानी सोनेरी मुलामा दिलेला नारळ समुद्राला सायंकाळी अर्पण केला. 

समुद्राकाठी राहणार्‍या आणि प्रामुख्याने मासेमारी करणार्‍या कोळी बांधवांचा हा महत्त्वाचा सण आहे. पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. बोटी, जहाजांची वर्दळ या काळात बंद असते. समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित राहाव्यात; तसेच समुद्र शांत होण्यासाठी कोळी बांधव या दिवशी नारळ अर्पण करून दर्या राजाची पूजा करतात. मात्र, सध्या कोरोना साथीमुळे जिल्ह्यात नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी न करता   साधेपणात करण्यात आली.

-------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: सतर्कतेचा इशारा! महाराष्ट्रात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा धोका; पण कुठे? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेमुळे सुखदा खांडकेकरला ऐकावे लागलेले टोमणे; मग अभिनेत्रीने ठरवून घेतला तो निर्णय

Pune Traffic Alert: आषाढी वारी पालखी आगमनादिवशी पुण्यात पालखी मार्गावरील वाहतूक तीन टप्प्यांत बंद

Manchar Rain Update : आहुपेत ४०७ मिमी, भीमाशंकरमध्ये २९७ मिमी पाऊस; डिंभे धरणाच्या पाणीसाठ्यात एका दिवसात मोठी वाढ

Ambegaon Heavy Rain : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील गावांना मुसळधार पावसाने झोडपून काढले; ओढ्या, नाल्यांना पुर, शेतात रस्त्यावर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT