ambarnath sakal
मुंबई

अंबरनाथला : गुडघाभर पाण्यातून अंत्ययात्रा

भुयारी मार्गात पाणी साचल्याने याशिवाय गटाराचे पाणीही कायम होते. त्यामुळे अंत्ययात्रा पाण्यातूनच काढण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

अंबरनाथ : पावसाच्या पाण्यासह गटारातील सांडपाण्यातून वाट काढत अंत्ययात्रा काढण्याची वेळ बदलापूरमधील बेलवली परिसरातील रहिवाशांवर आली. रामचंद्र पाटील यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी पार्थिवावर बेलवलीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. मात्र, बेलवली येथील स्मशानभूमीत जाण्यासाठी अंबरनाथ-बदलापूर रेल्वेमार्गाखालून भुयारी मार्गाची सोय आहे. मात्र, भुयारी मार्गात पाणी साचल्याने याशिवाय गटाराचे पाणीही कायम होते. त्यामुळे अंत्ययात्रा पाण्यातूनच काढण्यात आली.

बेलवली भागातून कात्रप आणि परिसरात जाण्यासाठी असलेले रेल्वे क्रॉसिंगवरील फाटक रेल्वेने बंद केले. याशिवाय त्याठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी भुयारी मार्गाची सोय करण्यात आली. , मात्र या भुयारी मार्गात कायम बाजूच्या नाल्यातील पाणी असल्याने तसेच पावसाळ्यात पाणी साचत असल्याने भुयारी मार्गही बंद असतो. पर्यायी मार्ग त्वरित निर्माण करण्याची गरज किशोर पाटील यांनी व्यक्त केली.

भुयारी मार्गामधील साचलेले पाणी काढण्यासाठी असलेली पंपिंग यंत्रणा सक्षम करू, रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी देखील प्रयत्न केले जातील, असे बदलापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Survey: मराठी संवर्धनासाठी महायुती सरकारचे प्रयत्न कितपत यशस्वी? ‘सकाळ’च्या सर्वेक्षणात उलगडलं चित्र

Silent Diseases Alert: 'हे' ५ शांतीत क्रांती करणारे आजार कधीच दाखवत नाहीत लक्षणं; डॉक्टर देतात वेळीच सावध होण्याचा इशारा

Latest Marathi News Live Update : दुबई मरीना बीचचा रोमांच आता थेट मुंबईच्या जुहू समुद्रकिनारी अनुभवता येणार

Sakal Survey 2025: महायुती सरकारची वर्षपूर्ती! मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांची कामगिरी कशी होती?

Redmi 15C 5G मोबाईल लॉन्च! 'या' तारखेपासून विक्री सुरू; 12 हजारात बेस्ट कॅमेरा अन् 6300 mAh मोठी बॅटरी, 50 हजारच्या फोनचे फीचर्स

SCROLL FOR NEXT