ambarnath
ambarnath sakal
मुंबई

अंबरनाथला : गुडघाभर पाण्यातून अंत्ययात्रा

सकाळ वृत्तसेवा

अंबरनाथ : पावसाच्या पाण्यासह गटारातील सांडपाण्यातून वाट काढत अंत्ययात्रा काढण्याची वेळ बदलापूरमधील बेलवली परिसरातील रहिवाशांवर आली. रामचंद्र पाटील यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी पार्थिवावर बेलवलीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. मात्र, बेलवली येथील स्मशानभूमीत जाण्यासाठी अंबरनाथ-बदलापूर रेल्वेमार्गाखालून भुयारी मार्गाची सोय आहे. मात्र, भुयारी मार्गात पाणी साचल्याने याशिवाय गटाराचे पाणीही कायम होते. त्यामुळे अंत्ययात्रा पाण्यातूनच काढण्यात आली.

बेलवली भागातून कात्रप आणि परिसरात जाण्यासाठी असलेले रेल्वे क्रॉसिंगवरील फाटक रेल्वेने बंद केले. याशिवाय त्याठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी भुयारी मार्गाची सोय करण्यात आली. , मात्र या भुयारी मार्गात कायम बाजूच्या नाल्यातील पाणी असल्याने तसेच पावसाळ्यात पाणी साचत असल्याने भुयारी मार्गही बंद असतो. पर्यायी मार्ग त्वरित निर्माण करण्याची गरज किशोर पाटील यांनी व्यक्त केली.

भुयारी मार्गामधील साचलेले पाणी काढण्यासाठी असलेली पंपिंग यंत्रणा सक्षम करू, रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी देखील प्रयत्न केले जातील, असे बदलापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT