मुंबई

एक तासानंतर आर्यन वकिल मानशिंदेंसोबत NCB कार्यालयातून पडला बाहेर

आर्यन वकिल निखिल मानशिंदे यांच्यासोबत सफेद रंगाच्या रेंज रोव्हरमधुन आला होता.

दीनानाथ परब

मुंबई: मागच्या आठवड्यात ड्रग्ज प्रकरणात (Drug case) मुंबई उच्च न्यायालयाकडून (Mumbai high court) जामिन मिळाल्यानंतर आर्यन खान (Aryan khan) आज पहिल्यांदा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (Ncb) समोर हजर झाला. आर्यनला जामीन मंजूर करताना न्यायालयाने आठवड्यातून एकदा एनसीबी समोर हजर राहण्याची अट ठेवली आहे. दक्षिण मुंबईत NCB चं कार्यालय असून आर्यन आपले वकिल निखिल मानशिंदे यांच्यासोबत सफेद रंगाच्या रेंज रोव्हरमधुन आला होता.

दर शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत मुंबईतील एनसीबी कार्यालयात आर्यनला हजर रहावे लागणार आहे. आर्यन खान ३० ऑक्टोबर रोजी तुरुंगातून बाहेर आला होता. तब्बल २७ दिवसानंतर आर्यनची आर्थर रोड कारागृहातून सुटका झाली होती. आर्यन आणि सह आरोपी अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा यांना जामिन मंजूर करताना मुंबई उच्च न्यायालयाने १४ अटी टाकल्या आहेत.

आर्यन खानला एनडीपीएस कोर्टात आपले पासपोर्ट जमा करावे लागेल तसेच विशेष कोर्टाची परवानगी घेतल्याशिवाय तो देशाबाहेर जाऊ शकणार नाही, अशा अटी उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करताना ठेवल्या होत्या. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या तिघांना एनसीबीने ३ ऑक्टोबर रोजी ड्रग्ज प्रकरणात एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमांखाली अटक केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT