मुंबई: विधान परिषदेच्या निवडणुकांवरून सध्या राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आमदार म्हणून बिनविरोध निवड व्हावी यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष आग्रही आहेत. मात्र काँग्रेसनं ऐनवेळी दोन उमेदवार देऊन यात गोंधळ घातला आहे. या संधीचा फायदा घेत भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीला टोला लगावलाय.
विधानपरिषदेच्या निवडणूकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बिनविरोध निवडून आणायचं असेल तर काँग्रेसनं एक उमेदवार देणं अपेक्षित होतं. मात्र ऐनवेळी काँग्रेसनं एक नव्हे तर दोन उमेदवार रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महाविकास आघाडीत मतभेद आहेत की काय असा प्रश्न सर्वांनाच पडू लागला. त्यात आता आशिष शेलार यांनी महाविकास आघडीला टोला लगावलाय.
'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सन्मान आणि राज्यातली परिस्थिती पाहता निवडणुका बिनविरोधच व्हायला हव्यात! ती जबाबदारी सत्ताधारी पक्षाची आहे. तसंच आम्ही आमच्या मतांप्रमाणे उमेदवार दिले आहेत. काँग्रेस ऐकत नाही यावरून आघाडीत जो बेबनाव सुरू आहे त्यामध्ये आम्हाला ओढू नका, असं ट्विट आशिष शेलार यांनी केलं आहे.
महत्तावाची बातमी ः ...म्हणून महाडकरांचे टेन्शन वाढले
काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत मतांची टक्केवारी पाहत भाजपनंही बिनविरोध निवडणुका होण्यासाठी विचार केला पाहिजे असं मत मांडलं होतं. मात्र आशिष शेलारांनी यावरही उत्तर दिलंय. "महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष तुमचा ऐकत नसेल आणि आडमुठी भूमिका घेत असेल तर त्याचे बोट आमच्याकडे दाखवू नका", असं आशिष शेलार यांनी म्हंटलंय.
दरम्यान विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आग्रही आहेत. तरीही काँग्रेसनं दुसरा उमेदवार जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडीत मतभेद निर्माण होतात की काय असे चिन्हं दिसत आहेत.
Ashish Shelar taunt at Mahavikas Aghadi
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.