पोलिसांवर होणारे हल्ले हे कायदा सुव्यवस्थेवर झालेल्या हल्ल्यासारखे आहेत, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. पोलिसांवर हाल उचलणं म्हणजे कायदा सुव्यवस्थेच्या कानशिलात लगावण्यासारखं आहे, असं न्यायालयाने नमूद केलं आहे. मुंबई सत्र न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीदरम्यान हे निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे.
२०११ साली सायन रेल्वे स्टेशनजवळ सुरू असलेलं भांडण सोडवण्यासाठी दोन पोलीस गेले असता आरोपीने पोलिसांवर हात उगारलं, त्यांच्या कानशिलात लगावली. याप्रकरणी अनिल घोलप याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या १० वर्षांपासून ही सुनावणी सुरू होती. आता अखेर या प्रकरणाचा निकाल लागला आहे.
यावेळी मुंबई सत्र न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवत आरोपीला चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि ११ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.