Akshay Shinde Encounter sakal
मुंबई

Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदे याचे वकिल आणि कुटुंबियांची पोलिस संरक्षणाची मागणी

Akshay Shinde Encounter : बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी आणि वकिलांनी अंत्यसंस्कारासाठी जागा आणि पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला जीविताचा धोका असल्याचा आरोप केला आहे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : बदलापूर चिमुरड्यांवर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला आहे. बदलापूर येथे अक्षय याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास विरोध करण्यात आला आहे. यामुळे अक्षय याच्या कुटुंबियांनी गुरुवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली.

अक्षय याच्या अंत्यसंस्काराकरीता जागा देण्यात यावी. तसेच आमच्या जिविताला धोका असल्याने सरकारने आम्हाला पोलिस संरक्षण द्यावे अशी मागणी यावेळी कुटुंबाकडून केली आहे.बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा मृतदेह दफन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बदलापूर येथे त्याचे अंत्यसंस्कार करण्यास विरोध दर्शविण्यात आला आहे. त्याच्या कुटुंबियांनी याप्रकरणी बदलापूर पोलिसांची देखील भेट घेतली आहे. याप्रकरणी दफन भूमीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर गुरुवारी शिंदे कुटुंब व अक्षय याचे वकील अमित कटारनवरे कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर झाले होते.

यावेळी अक्षय याचे नातेवाईक अमर शिंदे यांनी सांगितले की, अक्षय शिंदे याचा खटला लढणारे वकिल आणि त्यांच्या आईवडिलांच्या जिविताला धोका आहे. अक्षय याच्यावर गुन्हा दाखल होताच बदलापूर मध्ये त्याच्या कुटुंबावर हल्ला करण्यात आला होता. यामुळे कुटुंबाला पोलीस संरक्षण तसेच अक्षय याच्या अंत्यसंस्कारा करीता पोलिस बंदोबस्त द्यावा. ही मागणी राज्याचे गृहमंत्र्यासह पोलिस प्रशासन आणि न्यायालयाकडे केली आहे. अक्षय शिंदे यांच्या खटल्यातील दोषाराेप पत्राची पत्र मिळावी ही देखील मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

अक्षय शिंदे याचे वकिल अमित कटारनवरे यांनी सांगितले की, न्याायलयात कालच विषय मांडला आहे. त्यांना दफनभूमीसाठी जागा मिळत नाही. सरकारच्या वतीने वकिलांनी स्पष्टीकरण दिले मात्र संध्याकाळपर्यंत तसे काही घडले नाही. त्यानंतर पोलिस उपायुक्तांशी बोलणे झाले. त्यांच्या सांगण्यानुसार न्यायालयात जे पत्र दिले आहे. त्यानुसार सकाळी पिडीताच्या नातेवाईकाना बोलविले. दोन तीन स्पॉट सांगितले आहेत. त्यानुसार त्याठिकाणी दफन केले जाणार आहे.

अक्षय शिंदे यांच्या नातेवाईकांनी त्यांना सरंक्षण मिळावे अशी मागणी केली आहे. सरकारने त्यांना समानतेच्या अधिकारावर संरक्षण दिले पहिजे. किरीट सोमय्याला जसे पटकन संरक्षण दिले जाते. त्याच पद्धतीने किरीट साेमय्याच्या तुलनेच अक्षय शिंदे यांच्या कुटुंबियांना जास्त संरक्षणाची गरज आहे. त्यांच्या जिवीतास जास्त धोका आहे. घटना घडल्यानंतर त्यांच्या घरावर हल्ला झाला होता. त्यामुळे त्यांना संरक्षण दयायला पाहिजे असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT