शाहीर आत्माराम पाटील Sakal
मुंबई

संयुक्त महाराष्ट्राचा लढा अजूनही पुस्तकात नाही

शाहीर आत्माराम पाटील यांच्या पत्नीची खंत

विनोद राऊत

मुंबई - ‘संयुक्त महाराष्ट्र उगवतोय सरकारा खुशाल कोंबडं झाकून धरा...’ संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जीव ओतणारा हा गोंधळ शाहीर आत्माराम पाटील यांनी लिहिला होता. तो जेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या सभांमध्ये सादर केला जायचा, तेव्हा टाळ्यांनी आसमंत दणाणून जायचा. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शाहीर अमर शेख, अण्णा भाऊ साठे, द. ना. गव्हाणकर, आत्माराम पाटील यांच्यासारख्या कित्येक शाहिरांनी अमूल्य योगदान दिले; मात्र या शाहिरांचे योगदान नव्या पिढीला माहिती नाही. संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात येऊन ६२ वर्षे लोटून गेली, पण अजूनही राज्य सरकारने शालेय अभ्यासक्रमात या लढ्यावर एक धडाही समाविष्ट केला नाही, अशी खंत दिवंगत शाहीर आत्माराम पाटील यांच्या पत्नी इंद्रायणी पाटील यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केली.

सध्या काही जण मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा करत आहेत. मला त्यांना विनंती करायची आहे, की पहिले मुंबई महाराष्ट्राला कशी मिळाली याचा इतिहास तरी वाचा. त्यानंतर तोडण्याची भाषा करा, असेही इंद्रायणी पाटील यांनी सुनावले. शिक्षकांना संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती द्यायची आहे; मात्र पुस्तकात धडाच नाही ते तरी काय करणार, असा सवालही त्यांनी केला. संयुक्त महाराष्ट्र मिळाल्यावर आत्माराम पाटील यांना मुंबईतच मराठीजणांच्या होणाऱ्या गळचेपीबद्दल खूप त्रास व्हायचा; मात्र ते कुणाला काही न बोलता फक्त पोवाडा-कवितेतून व्यक्त होत असत, असेही इंद्रायणी पाटील यांनी सांगितले.

व्यवसायाकडे दुर्लक्ष!

आत्माराम पाटील यांचा भाजीचा व्यवसाय चांगला चालला होता. मात्र त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी संसाराकडे आणि व्यवसायाकडे दुर्लक्ष केले. या काळात डोक्यावर साडेचार लाख रुपयाचे कर्ज झाले; मात्र त्याची खंत त्यांना कधीच नव्हती. आमच्या दुकानातील नोकर मला म्हणायचे, तुम्ही कृपया सांगा दादांना, आता बस करा. मात्र मी काय सांगणार? संयुक्त महाराष्ट्र मिळाल्यावर त्यांना आनंद झाला. स्वप्न पूर्ण झाले... अशा कित्येक आठवणी इंद्रायणी पाटील यांनी सांगितल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Election 2025 First Phase Voting: बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १२१ जागांसाठी १३१४ उमेदवार निवडणुकींच्या रिंगणात!

Pune Crime : बाजीराव रस्त्यावरील खून प्रकरणातील 'त्या' अल्पवयीन आरोपींची बालसुधारगृहात रवानगी

Rahul Gandhi H Files : राहुल गांधींच्या 'एच फाइल्स'मधील मत चोरीच्या आरोपानंतर आता नवी अपडेट आली समोर!

Radha Buffalo : साताऱ्यातील ‘राधा’ म्हशीची ‘गिनेस बुक’मध्ये नोंद; जगातील सर्वांत ठेंगणी म्हैस म्हणून दखल

Online Voter Registration : ऑनलाइन मतदार नोंदणी! पदवीधरांना फुटला घाम; एक अर्ज जमा व्हायला दिवसभराची प्रतिक्षा

SCROLL FOR NEXT