मुंबई

सावधान! मुंबई, ठाणे पालघरला हवामान खात्याने दिला मोठा इशारा; रायगड, रत्नागिरीतही अंबर अलर्ट जाहीर

समीर सुर्वे



मुंबई: रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात रविवार पर्यंत 204 मि.मी पर्यंत पाऊस होण्याची शक्‍यता आहे.या दोन जिल्ह्यांसाठी मुंबई वेधशाळेने अंबर अलर्ट जारी केला असून सर्व यंत्रणांना सज्जतेचा इशारा देण्यात आला आहे.तर,पालघर मध्ये गुरुवारी अशी परीस्थीती राहाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून तेथेही गुरुवारसाठी अंबर अलर्ट जाहीर करण्यात आला .मुंबईत पुढील दोन दिवस जोरदार पावसासह 45 ते 55 किलोमिटर वेगाने वारे वाहाणार आहेत.

मुंबई, ठाणे, सिंधूदुर्ग जिल्ह्यात रविवार पर्यंत धुवाधार पाऊस होणार आहे. मुंबईच्या उपनगरात आज जोरदार पाऊस झाला. बोरीवली येथे सर्वाधिक 156.4 मि.मी पाऊस संध्याकाळ 6 वाजे पर्यंत 24 तासात नोंदविण्यात आला आहे. तर, पुर्व उपनगरात भांडूप येथे 112 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. कुलाबा येथे 22.2 मि.मी पाऊस नोंदविण्यात आला आहे. मुंबईत मंगळवारी रात्री पासूनच पावसाने चांगला जोर धरला होता. दुपारी उपनगरातील अनेक भागात जोरदार पावसासह सोसाटयाचा वाराही वाहत होता.काही वेळा वाऱ्याचा वेगही ताशी 50 किलोमिटर वेगा पर्यंत पोहचला होता. पवई येथे 105.2,लोखंडवाला अंधेरी येथे 138.6,मालाड 122.6 मि.मी पाऊस नोंदविण्यात आला आहे.

अरबी समुद्रात आणि घाट माध्यावर पावसाळी ढग जमा असल्याने पावसाचा जोर वाढला आहे.रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात रविवार पर्यंत ही परीस्थीती राहाणार आहे.असे वेधशाळेकडून सांगण्यात आले.अंबर अलर्ट असल्याने नाविक दल,तटरक्षक दल राष्ट्रीय आपत्ती निवारण बल तसेच स्थानिक प्रशासनाला सज्जतेचा इशारा देण्यात आला आहे.मुंबईत पुढील 48 तास जोरदार पावसासह वेगाने वारे वाहाण्याची शक्‍यता आहे.

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT