मुंबई

BhandaraHospitalfire | मन सुन्न करणारी घटना; मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे प्रशासनाला निर्देश

तुषार सोनवणे

मुंबई  : भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत निष्पाप 10 बालकांचा मृत्यू होणे, ही अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना आहे. यासंदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. 
सध्याच्या काळात राज्यभरातली आरोग्य यंत्रणा, सर्व रुग्णालये कोरोनाशी लढत आहेत; मात्र रुग्णालयाच्या सुरक्षेशी तडजोड अजिबात चालणार नाही. अशा दुर्घटना भविष्यात होऊ नये म्हणून राज्यातील सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडीट तपासण्याचे निर्देशदेखील त्यांनी दिले आहेत. या घटनेविषयी कळताच मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली, घटनेची विस्तृत माहिती घेऊन वाचलेल्या बालकांच्या उपचारांत कोणतीही हयगय होणार नाही हे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.

मृत 10 बालकांच्या पालकांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदतीची घोषणा देखील त्यांनी केली. तसेच, या आगीत कुणी जखमी झाले असल्यास त्यावर देखील उपचार करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. या आगीतून अग्निशमन विभागाचे अधिकारी व वैद्यकीय कर्मचार्यांनी सात बालकांना वाचविले आणि आग पसरू नये म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा केली म्हणून संपूर्ण रुग्णालय वाचले. या वाचलेल्या बालकांवर कोणतीही हयगय न होता व्यवस्थित उपचार सुरु ठेवा, असे निर्देश दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. 
नागपूरच्या अग्निशमन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे तज्ज्ञ आणि विद्युत विभागाचे अधिकारी भंडारा येथे उपस्थित असून आगीच्या नेमक्‍या कारणांचा शोध घेत आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

ही घटना मन सुन्न करणारी आहे. कोवळ्या जीवांना मरण आले. कितीही सांत्वन केले तरी हे दु:ख भरून येणारे नाही. मी मुख्यमंत्री म्हणून या दुर्दैवी घटनेत मरण पावलेल्या बालकांच्या पालकांच्या भावना समजू शकतो. राज्य शासन त्यांच्या दु:खात सहभागी आहे. या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर चौकशी करून तत्काळ कठोरात कठोर कारवाई करण्यास मी गृहमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांना सांगितले आहे. 
- उद्धव ठाकरे,
मुख्यमंत्री 

ऑडिटबाबत चौकशी 

भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीतील बालकांसाठीच्या या नव्या कक्षाचे लोकार्पण 2015 मध्ये झाले होते; मात्र त्याचे ऑडीट पूर्ण झाले होते किंवा नाही आणि झाले नसेल तर का झाले नव्हते, याविषयी संपूर्ण माहिती घेऊन तातडीने पुढील कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच, या दुर्घटनेच्या तपासाची अद्ययावत माहिती दररोज कळवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. 

पोलादपूर अपघाताचीही दखल 

पोलादपुर तालुक्‍यातील कुडपण ,धनगर वाडी येथे लग्नाच्या वऱ्हाडाचा ट्रक दरीत कोसळून झालेल्या अपघाताची दखलही मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांप्रती शोकसंवेदना प्रगट करत जखमींवर व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. 

------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT