Uddhav-Thackeray 
मुंबई

"केंद्राच्या नावाने कांगावा अन् नुसताच शब्दांचा फुलोरा"

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर भाजपचं सरकारवर टीकास्त्र

विराज भागवत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर भाजपचं सरकारवर टीकास्त्र

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी रात्री जनतेशी लाइव्ह व्हिडीओच्या माध्यमातून संवाद साधला. राज्यातील कोरोनाची स्थिती, लॉकडाउनची गरज, वैद्यकीय सेवांची सद्यस्थिती तसेच लसीकरणासाठी उत्सुक असलेला नवा वर्ग या सर्व विषयांवर त्यांनी भाष्य केले. मात्र, मुख्यमंत्र्यांचे भाषण हे निव्वळ भुलभुलय्या असल्याची टीका भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली. "कालचे मुखमंत्र्याचे भाषण म्हणजे निव्वळ भुलभुलय्या... ना कोणती उत्तरं, ना कोणती दिशा. १२ कोटी लसी लगेच घेण्याच्या वल्गना पण त्या देण्याच्या व्यवस्थेचे काय? पाच लाख लसी महाराष्ट्रात दिल्याच नाहीत, मग तरी त्याची घोषणा करण्यात कसली शेखी? बाते बडी बडी, काम का तो कूछ पता नहीं हे या राज्य सरकारचं वैशिष्ट्य आहे", अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

"मदत होत आहे, कामे केली जात आहेत, अशी सगळी भाषा या फेसबुक लाईव्हमध्ये होती. पण राज्यात फक्त १० लाख लसीकरणाची क्षमता आहे तर सांगितली का नाहीत? किती हजारांमागे केंद्र उभी केली? त्यांची यादी, ही लस देण्यासाठी काय यंत्रणा उभी केली आहे? १८ ते ४४ मध्ये परत वयाच्या अटी टाकणार की नावनोंदणी केली की त्याला लस देणार? यातल्या एकाही प्रश्नांची उत्तर दिली नाहीत. कारण नुसताच शब्दांचा फुलोरा करण्याची सवय या सरकारला लागली आहे. १२ कोटी लसी देण्यासाठी एक रकमी चेक देणारे इथल्या डॉक्टर, नर्सेंस, आरोग्य सेवात काम करणाऱ्यांच्या समस्यांकडे मात्र लक्ष देत नाहीत", असं ट्वीट त्यांनी केलं.

"१५ दिवस कडक निर्बंध वाढवताना काही ठोस माहिती घेऊन येतील असे वाटलं होते. सहा महिन्यांपूर्वी दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवणारे मुख्यमंत्री त्याची तयारी मात्र काहीच न करता केवळ 'हे सुरू ते सुरू' अशी गोल गोल उत्तरं देतात. रिक्षाचालकांना मदतीची जी घोषणा केली होती, ती रक्कम देऊ शकले नाहीत. महाराष्ट्रातील बारा बलुतेदार, शेतकरी सगळेच मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. रेमडेसीवर व ऑक्सिजनचा साठा पुरेसा असल्याचे न्यायालयात राज्य सरकार सांगते. मात्र मुख्यमंत्र्यापासून सर्व जण बाहेर केंद्र सरकारच्या नावाने कांगावा करतात, हे जनता पहात नाही अशा भ्रमात कुणी राहू नये", असा इशाराही त्यांनी ट्विटच्या माध्यमातून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Heatwave Deaths : विदर्भात उष्णतेची भयंकर लाट ! नागपुरात उष्माघाताने एकाच दिवशी ३ जणांचा मृत्यू; IMD चा नागरिकांना इशारा

Aurangabad Accident: कामावरून घरी परतताना काळाचा घाला! लिंबेजळगावजवळ भीषण अपघातात दोन मजुरांचा दुर्दैवी अंत, महामार्गावर मृत्यूचा थरार..

Petrol-Diesel Rate: पेट्रोल-डिझेलच्या दरांत 4 दिवसांत दोनदा दरवाढ! काय आहे आजचे नवे दर?

Ratnagiri Blast: Ratnagiri सरपण गोळा करताना अनोळखी वस्तू दिसली, कुतुहलाने उचलताच झाला स्फोट; महिलेच्या हाताची बोटे तुटली

Walmik Karad: आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती ढासळली; 'युरोसिस्टायटीस' नावाचा गंभीर आजार! तीन दिवसांपासून सलाईनवर, कारागृहातच...

SCROLL FOR NEXT