Sheetal-Gambhir-Desai sakal media
मुंबई

मुख्यमंत्र्यांनी जाधवांच्या पराक्रमाचे पोस्टर छापून समोर धरावे, भाजपचा घणाघात

कृष्णा जोशी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी यापुढील पूरग्रस्त भागाच्या (Flood Area) दौऱ्यात चिडलेल्या नागरिकांना लांब ठेवण्यासाठी गुंड, बाऊन्सर, बॉडिगार्ड आपल्याभोवती न ठेवता फक्त तेजःपुंज भास्करच्या चिपळूणनगरीतील (Chiplun) पराक्रमाचे पोस्टर छापून ते आपल्यासमोर धरावे. पूरग्रस्त, नाडलेली जनता आपोआप घाबरून पळ काढेल, अशा शब्दांत भाजप (BJP) महिला मोर्चाच्या मुंबई अध्यक्ष शीतल गंभीर देसाई (Shital Desai) यांनी भास्कर जाधव यांना शालजोडीतले दिले आहेत. ( bjp leader shital desai Criticizes cm uddhav thackeray over Bhaskar jadhav issue-nss91)

चिपळूण येथील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसमोर तक्रार मांडणाऱ्या महिलेवर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी हात उगारल्याचा व्हिडियो प्रसिद्ध झाला आहे. त्यावर श्रीमती देसाई यांनी उपरोधिक शब्दांत प्रतिक्रिया देताना जाधव यांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला आहे. भास्कर हे सूर्याचे नाव आहे, सूर्य हा सर्व सृष्टीला जगण्याची उर्जा देतो, पण त्याच्या जास्त जवळ गेले की तो आपल्या किरणोत्साराने सर्वांना भाजून काढतो. त्याचप्रमाणे भास्कर नाव असलेल्या काही व्यक्तीही आपल्या प्रखर तेजाने समोरच्याला भस्म करू शकतात, हे प्रथमच दिसून आले. चिपळूणनगरीतील या तेजस्वी भास्कराच्या पराक्रमाने साऱ्यांचेच डोळे दिपले आहेत. स्त्रीयांचा आदर करणाऱ्या या भास्कराला मुख्यमंत्र्यांनी विशेष पुरस्कार द्यावा, अशी उपरोधिक टीकाही श्रीमती देसाई यांनी केली आहे.

वास्तविक भास्कराच्या जवळ जाऊन मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणाऱ्या त्या महिलेचीच सर्व चूक आहे. अगदी भगवदगीतेतील वर्णनाप्रमाणे सहस्त्रसूर्यांचे तेज अंगी असणाऱ्या या भास्करावर डोळे वटारले की असेच होणार, हे त्या महिलेला कळायला हवे होते. चिपळूणनगरीच्या भास्कराला कधीही ग्रहण लागत नाही असे म्हणतात. पण ग्रहणातही भास्कराकडे डोळे वर करून पाहिले तर आपलीच दृष्टि जाते, हे त्या सर्व संपत्ती गमावलेल्या महिलेला कळायला हवे होते, असे शालजोडीतले देखील श्रीमती देसाई यांनी लगावले आहेत.

यापुढे कोणाही शिवसेना नेत्याला आपत्तीग्रस्त जनतेना दूर पिटाळण्यासाठी हात उगारण्याचीही गरज नाही. फक्त भास्कराच्या या तेजाने भरलेल्या पराक्रमाचे पोस्टर आपल्यासमोर धरले की रयतेला धाक बसेल. जहाल किरणोत्सर्गी किरणांचा वर्षाव असाच रयतेवर करण्याचे काम असेच सुरू ठेवावे हीच या भास्कराला शुभेच्छा, असेही श्रीमती देसाई यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PPF vs ELSS vs NPS: 5,000 रुपयांची दरमहा गुंतवल्यास कुठे मिळेल जास्त परतावा? 15 वर्षांत किती तयार होईल फंड

Ankshastra : 'या' 3 मुलांकाचे लोक असतात प्रचंड कृतघ्न; चांगुलपणाची कधीच करत नाहीत परतफेड, मित्र म्हणून मदत करण्यापूर्वी नक्की करा विचार

Latest Marathi News Live Update : हे बिल दलित आणि मागासवर्गीय लोकांच्या हिताचे नाही - राहुल गांधी

Indian Railways Free journey : 'या' लोकांना रेल्वेने मोफत प्रवास करता येणार, वाचणार हजारो रुपये; काय आहे MST योजना?

MPSC Success Story: ऊसतोड मजुराच्या मुलाची जिद्दीची कमाल; तांड्यावरून न्यायालयापर्यंतचा प्रवास, ज्ञानेश्वर चव्हाण झाले न्यायाधीश!

SCROLL FOR NEXT