ठाणे : ठाणे महापालिका (Thane Municipal corporation) हद्दीतील घोडबंदर पट्ट्यातील अनेक उच्चभ्रू सोसायट्यांना पाणीटंचाईचा (water scarcity) सामना करावा लागत आहे. पाणी समस्येवर तोडगा मिळेपर्यंत आंदोलनात्मक लढा उभा करू व प्रशासनाला पाण्याची समस्या सोडवण्यास भाग पाडू, असा इशारा आमदार संजय केळकर (sanjay kelkar) यांनी दिला. महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी शहरात पाणी समस्येवरून राजकारण पेटण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
ठाणे शहरातील घोडबंदर भागातील नागरिकांना पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत. ही पाणी समस्या मार्गी लावण्यासाठी भाजपच्या वतीने शनिवारी पाणी एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी ते बोलत होते. कोट्यवधींचा फ्लॅट घेऊनही पाणी नाही. एका सोसायटीला रोज दोन टॅंकर पाणी खरेदी करत आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. या परिषदेनंतर सत्ताधारी आणि महापालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा संजय केळकर यांनी दिला. या वेळी पाणी परिषदेला भाजपचे माजी गटनेते मनोहर डुंबरे, विकास पाटील, कैलास म्हात्ने, राम ठाकूर आदींसह घोडबंदर पट्ट्यातील अनेक सोसायट्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
उच्च न्यायालयात याचिका
एल्गार परिषदेचे आयोजक मधू नारायणमुन्नी यांनी उच्च न्यायालयात पाणी समस्येबाबत याचिका दाखल केली आहे. २४ मार्चला सुनावणी होणार आहे. कायदेशीर मार्गाने ठाणेकरांना योग्य तो न्याय मिळेल, अशी अपेक्षा विशद केली जात आहे. तरीसुद्धा पाणी समस्येवर तोडगा निघेपर्यंत योग्य त्या मार्गाने आंदोलनात्मक लढा उभारण्यात येईल, असे आमदार केळकर यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.