मुंबई

भाजप-शिवसेना युती होणारच : रावसाहेब दानवे

सकाळवृत्तसेवा

पालघर : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होणारच, असा विश्‍वास भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पालघरमध्ये नुकताच व्यक्त केला. भाजप-शिवसेना युती करून आगामी दोन्ही निवडणुका जिंकतील, असे ते यावेळी म्हणाले. 

आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर रावसाहेब दानवे दोन दिवसांच्या पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे संघटनमंत्री विजयराव पुराणी, पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार राजेंद्र गावित, आमदार संजय केळकर, आमदार पास्कल धानोरे आदी उपस्थित होते. यावेळी पालघरमधील भाजप नेत्यांची त्यांनी बैठक घेतली. पालघरमधील निवडणूक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशीही संवाद साधला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला आहे. पक्षसंघटनेत बुथ स्तरापासून कार्यकर्त्यांच्या नियुक्‍त्या झाल्या असून निवडणुका जाहीर होताच कार्यकर्त्यांची ही फळी वेगाने कामाला लागेल, असे ते म्हणाले. 

भाजप आणि शिवसेनेच्या युतीबाबत त्यांना विचारण्यात आले असता, ते म्हणाले, "आगामी लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांमध्ये युती होईल. दोन्ही पक्ष युती करूनच या निवडणुका जिंकतील.' 

युतीबाबत पेच कायम 

पालघर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना युती होईल किंवा नाही ही शंकाच आहे. लोकसभेची जागा ही भाजपसाठी आहे, तर शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी ही जागा आधीच श्रीनिवास वनगा यांच्यासाठी घोषित केली आहे. त्यामुळे या जागेसाठी पेच निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

युती झाली तर भाजपचे खासदार राजेंद्र गावित यांचे काय, हाही प्रश्‍न विचारण्यात येत आहे. येथील विधानसभेची जागा सेनेची असून या जागेवर भाजपचेही उमेदवार इच्छुक आहेत. त्यामुळे येथे युतीचा पेच कायम आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT