मुंबई

'शिक्षणमंत्री होश मे आओ'.. तावडेंना दाखविले काळे झेंडे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - "शिक्षणमंत्री होश मे आओ', "विनोद तावडे गो बॅक', "विनोद तावडे खुर्ची खाली करा' अशा घोषणा देत छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिराचा परिसर आज दणाणून सोडला.

एका करिअर मार्गदर्शन कार्यशाळेच्या उद्‌घाटनाला शिक्षणमंत्री विनोद तावडे शुक्रवारी रवींद्र नाट्य मंदिर येथे आले होते. त्यावेळी एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे गुण कमी केल्याप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना काळे झेंडे दाखवत छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. या वेळी शिक्षणमंत्र्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी चर्चा करताना तुकड्या वाढवत आहोत आणि लेखी परीक्षांचे गुण धरावेत, यासाठी केंद्राशी बोलणी सुरू असल्याचे आश्‍वासन दिले. त्यावर छात्रभारतीचे मुंबई अध्यक्ष रोहित ढाले यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी संघटनेच्या शिष्टमंडाळासोबत चर्चा करण्याचे आश्‍वासन दिले. 

या वेळी छात्रभारतीचे मुंबई अध्यक्ष रोहित ढाले, उपाध्यक्ष विशाल कदम, सुनील राठोड, विकास पटेकर, सचिन काकड, जितेश कीर्दकुडे, अविनाश बनसोडे, आशीष जाधव, निकेत वाळके, समीर कांबळे, नीलेश झेंडे, दीपाली आंबे, रेवत थोरात आदींनी आंदोलनात सहभाग घेतला होता. 

एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे तोंडी परीक्षांचे अंतर्गत 20 गुण रद्द करत 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी घेतला होता. या निर्णयामुळे एसएससी बोर्डाची जवळपास चार लाख मुले नापास झाली आहेत. याउलट सीबीएसई आणि आयसीएससी बोर्डानी तोंडी परीक्षांचे गुण विद्यार्थ्यांना देऊ केले आहेत, त्यांचा निकालही चांगला लागला आहे. या सगळ्याचा फटका अकरावी प्रवेशावेळी एसएससी बोर्डाच्या मुलांना बसणार आहे. नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही, विनाअनुदानित तुकड्यांमध्ये जादा फी देऊन प्रवेश घ्यावा लागेल, अशा अनेक अडचणींचा सामना एसएससी बोर्डाच्या मुलांना करावा लागणार आहे. यामुळे एसएससी बोर्डाच्या विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे, असे छात्रभारती संघटनेने म्हटले आहे. 

प्रथम एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्या 
आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी चर्चा करताना तुकड्या वाढवत आहोत आणि लेखी परीक्षांचे गुण धरावेत यासाठी केंद्राशी बोलणी सुरू आहे, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या वेळी सांगितले. त्यावर आक्षेप घेत छात्रभारतीचे मुंबई अध्यक्ष रोहित ढाले यांनी, तुकडी वाढीने प्रश्‍न मिटणार नाही. सर्व अनुदानित तुकड्या आणि महाविद्यालये आधी एसएससी बोर्डासाठी राखून ठेवावेत. प्रथम एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्या, त्यानंतरच इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्या. विनाअनुदानित तुकडीतील अकरावी प्रवेश गरीब मुलांना महाग पडेल. तसेच अंतर्गत गुण न मिळाल्यामुळे जे एसएससी बोर्डाचे जे विद्यार्थी नापास झाले आहेत, त्यांना प्रमाणशीर अंतर्गत गुण देऊन पास करावे, असा आग्रह या वेळी छात्रभारतीने धरला. त्यानंतर या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी छात्र भारतीच्या शिष्टमंडाळासोबत बैठकीचे आश्‍वासन तावडे यांनी दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT