मुंबई

पिचकारी बहाद्दरांवरही पालिकेचा कारवाईचा दंडुका; 14 दिवसांत दीड लाखाची दंड वसुली

समीर सुर्वे


मुंबई: मास्क न वापरणाऱ्यांबरोबरच महापालिकेने रस्त्यावर थुंकणाऱ्यांविरोधातही कारवाई सुरू केली आहे. मागील 14 दिवसांत (18 सप्टेंबरपासून) पालिकेने 852 पिचकारी बहाद्दरांकडून प्रत्येकी 200 रुपयेप्रमाणे 1 लाख 46 हजार दंड वसूल केला आहे. घाटकोपर परिसरातून सर्वाधिक 232 जणांकडून 40 हजार 100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे; तर मास्क न वापरणाऱ्यांकडून 200 रुपयांची दंड वसुली केली जात आहे. याद्वारे पालिकेने आतापर्यंत तब्बल 60 लाखांचा दंड वसूल केला आहे. 

राज्य सरकारने एप्रिल महिन्यापासून सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. सुरुवातीला एक हजार रुपयांपर्यंतचा दंड वसूल केला जात होता. एवढी मोठी रक्कम सामान्य माणसाकडे नसल्याने समज देऊन सोडले जात होते. मात्र सप्टेंबरपासून पालिकेने 200 रुपयांचा दंड वसूल करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच कारवाईही अधिक वाढवली असून, एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत मास्क न वापरणाऱ्या 18 हजार 118 जणांवर कारवाई करून 60 लाख 4 हजार 850 रुपयांचा दंड वसूल केला आहे. 

सर्वाधिक दंडवसुली झालेला परिसर 
विभाग कारवाई केलेले नागरिक दंड वसुली 
घाटकोपर
(एन प्रभाग) 232 40,000 
कुर्ला (एल प्रभाग) 145 17,900 
गोरेगाव (पी दक्षिण प्रभाग) 130 26,000 

BMC action against  Spitting person

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : Vaibhav Suryavanshi ला 'राष्ट्रीय बाल पुरस्कार'! १४ व्या वर्षात पठ्ठ्याने गाजवलंय क्रिकेटचं मैदान, विजय हजारे ट्रॉफीतून घेतली माघार

Nagpur Truck Accident: 'समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात दोघांचा मृत्यू'; एकजण गंभीर, दुरुस्तीसाठी ट्रक उभा अन् काय घडलं?

Explained: अरवली पर्वतरांग मुगलांसाठी कशी ठरली वरदान? 300 वर्ष टिकलेल्या साम्राज्यामागचं रहस्य, आजही आहे भारताच्या पर्यावरणाची ढाल

Real Estate 2026 : नवीन वर्षात घरांच्या किंमती वाढणार की कमी होणार? कोणत्या घरांसाठी जास्त मागणी असेल? जाणून घ्या तज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : निवडणूक आयोगाचा आगळावेगळा नियम; उमेदवारांची घेणार लेखी चाचणी

SCROLL FOR NEXT