मुंबई

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी मुंबई महापालिकेला मिळाले केवळ 'इतके'च रुपये...

मिलिंद तांबे

मुंबई : देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत असूनही सरकार आणि देणगीदारांनी मुंबई मनपाला उघड मदत केली नाही. कोरोना संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी मुंबई पालिकेला गेल्या 4 महिन्यांत अवघ्या 86 कोटींची मदत मिळाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाचा वाटा यात मोठा असून एकूण जमा रक्कमेपैकी 84 टक्के रक्कम त्यांनी दिली आहे.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण याच शहरात आहेत.

कोरोनासाठी मुंबई पालिकेने आतापर्यंत किती रूपये खर्च केले आहेत, शिवाय महापालिकेला  कोणत्या विभागाने किती मदत केली याबाबतची माहीती RTI कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिकेकडे मागितली होती.

मुंबई पालिकेच्या वित्त विभागाच्या मुख्य कार्यालयाने कोरोना अंतर्गत मिळालेल्या विविध प्रकारच्या निधीची माहिती दिली.

मुंबई महापालिकेला गेल्या 4 महिन्यात कोरोनासाठी एकूण 86 कोटी 5 लाख 30 हजार 303 रुपये मिळाले आहेत. या निधीमध्ये मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांनी 72.45 कोटी रुपये दिले आहेत. ही सर्वात मोठी रक्कम आहे आणि प्राप्त झालेल्या एकूण निधीपैकी 84 टक्के वाटा आहे. त्यानंतर मुंबई उपनगर जिल्हाधिकार्‍यांनी 11.45 कोटी जमा केले आहेत. वस्त्रोद्योग मंत्रालयाने केवळ 50 लाख रुपये दिले आहेत. तर खासगी लोकांनी 35.32 लाख रूपयांची मदत पालिकेला केली असून आमदारांकडून केवळ 1.29 कोटी निधीमध्ये जमा झाले आहेत. यामध्ये केवळ 7 आमदारांचा समावेश आहे.

मुंबई पालिकेने कोरोनाच्या एकूण उपचारांसाठी 700 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च केला आहे. असे असले तरी पालिकेला केंद्र सरकारने अद्याप आर्थिक सहाय्य केलेले नाही. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देखील कोणतीही मदत अद्याप  प्राप्त झालेली नाही. मुंबई महापालिकेच्या तिजोरीत कोरोनासाठी पैसे उभे करण्यासाठी आयुक्त, महापौर, आयएएस अधिकारी आणि नगरसेवकांनी कोणताही पुढाकार घेतला नसल्याची बाब ही समोर आली आहे.

मुंबईतील कोरोऩा रूग्णांचा आकडा हा 1 लाख 12 हजारांच्या वर तर मृतांचा आकडा 6,244 इतका झाला आहे. मुंबईतील परीस्थिती आटोक्यात येत असल्याचं आता पाहायला मिळतंय. मात्र असं असलं तरीही मुंबई उपनगरात अद्यापही बाधीत रूग्ण सापडणे सूरूच आहे. त्यावर पालिकेचा खर्च दिवसेंदिवस वाढत असून जुलैपर्यंत मुंबई महापालिकेने 4 हजार कोटी रूपये खर्च केले आहेत. अतिरिक्त खर्चामुळे पालिकेला मोठा आर्थिक फटका बसला असून आगामी अर्थसंकल्प 12 हजार कोटी रूपयांनी कमी होणार असल्याचे सांगण्यात येते.

मुंबई शहर हे जरभरातील प्रमुख देशांपैकी एक आहे. देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका देखील याच शहराला बसला असून पालिकेची आर्थिक परिस्थिती यामुळे खालावण्याची शक्यता  आहे. त्यामुळे मुंबई पालिकेला सर्वानी मदत करण्याची गरज असून लोकप्रतिनीधींसह सर्व उद्योगपींनी मदत आता मदत करणे गरजेचे असल्याचे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सांगितले.

( संकलन - सुमित बागुल )

BMC received only few crores to fight against corona virus check RTI report

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: नावडत्या भेंडीच्या भाजीवरून घर सोडले; आईशी घातला वाद; १७ वर्षीय मुलाने ट्रेनने गाठली दिल्ली

ENG vs IND,3rd Test: बुमराहने कॅच घेतला अन् सिराजने इंग्लंडच्या सलामीवीराच्या समोर जाऊन केलं आक्रमक सेलिब्रेशन; Video

Nagpur News: मान हॉटेलमधील कुंटणखान्यावर छापा; जबलपूर महामार्गावरील घटना, पीडितेची सुटका, ६० हजारांचा ऐवज जप्त

Latest Marathi News Updates :दोन गट हातात कोयता घेऊन आमनेसामने; पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला

Nagpur News : ऑनलाइन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश; २० कोटींचे व्यवहा, छत्तीसगढ पोलिसांकडून नागपुरात सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT