Burden of crores on government through re appoinment of teachers dispute esakal
मुंबई

Mumbai News : दुबार शिक्षकांच्या माध्यमातून सरकारवर कोट्यवधींचा भार

संचमान्यता नसताना चुकीचा अर्थ काढून शालेय शिक्षण विभागाने केला गोंधळ

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील रात्रशाळांमध्ये शिक्षकांना दुबार नोकऱ्या देण्यासाठी शालेय शिक्षण विभाागाने घेतलेला निर्णय वादात सापडला आहे. पदांची उपलब्धता आणि एकूणच शाळांची संचमान्यता झालेली नसताना केवळ काही शिक्षक प्रतिनिधींच्या आग्रहामुळे रात्रशाळांमध्ये दुबार नोकऱ्यांचा आदेश जारी करण्यात आला यामुळे सरकारच्या तिजोरीतून गरज नसताना प्रत्येक वर्षांला ४५ कोटींहून अधिक रूपयांचा भार सरकारच्या तिजोरीवर नाहक पडत असल्याचे शिक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मुंबईसह राज्यात मोठ्या प्रमाणात अतिरिक्त शिक्षक असून त्यांना या रात्रशाळांवर नेमणूका देण्याऐवजी जे शिक्षक सरकारचा पूर्ण पगार घेतात, अशा शिक्षकांना रात्रशाळांमध्येही दुबार नोकरी दिल्याने सरकारला एकाच वेळी अतिरिक्त शिक्षक आणि दुबार शिक्षकांनाही वेतन द्यावे लागत असल्याने याविषयी शालेय शिक्षण मंत्र्यांनी दुबार शिक्षकांच्या नियुक्तीचा निर्णय तातडीने रद्द करण्याची मागणी शिक्षक परिषद, महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना तसेच राष्ट्रवादी शिक्षक संघटनेने केली आहे.

सरकारने १७ मे २०१७ रोजी रात्रशाळांसंदर्भात आदेश जारी करत त्यावेळी दुबार नोकरी करणाऱ्यांची रात्रशाळांतील सेवा समाप्त करून त्या जागेवर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केले होते. यामुळे सरकारचे कोट्यवधी रूपये वाचले होते. मात्र मुंबईतील काही संघटनेचे हित साधण्यासाठी शिक्षण विभागाने २०१७ मधील आदेश रद्द करून पुन्हा दुबार नोकऱ्यासाठी ३० जून २०२२ रोजी जीआर जारी केला. त्यात जे शिक्षक अगोदरच पूर्णवेळ कार्यरत आहेत, त्यांना पुन्हा या दुबार नोकऱ्या देण्यात आल्या आणि अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना सरकारकडून फुक्कटचे वेतन आणि दुबार शिक्षकांचा स्वतंत्र पगार द्यावा लागत आहे.

संचमान्यता नसताना दुबारचा घाट

शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या, शिक्षकांची पदे आदींची माहिती तसेच २०२२-२३ ची संचमान्यता पूर्ण झालेली नसतानाच दुबारचा निर्णय घेण्यात आला. एक हजारांहून अधिक अतिरिक्त शिक्षक असताना दुबार नोकऱ्या देण्याचा विषय नसताना तो विभागातील अधिकाऱ्यांनी रेटून एका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मोठा लाभ मिळवून दिला. यामुळे वर्षाला ४५ कोटींहून अधिक रूपये सरकारच्या तिजोरीतून द्यावे लागत आहेत.

रात्रशाळांच्या समितीही वादात .

राज्यातील रात्रशाळांच्या गुणवत्तेसाठी ३० जून २०२२ च्या निर्णयानुसार शिक्षक आमदार आणि इतर अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली होती. त्या समितीच्या केवळ काही बैठका झाल्या होत्या. समितीने कोणता अहवाल दिला, हे विभागाकडून जाहीर करण्यात आले नाही. यामुळे समितीही वादात सापडली असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lionel Messi Mumbai Tour: सचिन तेंडुलकरसोबत भेट ते प्रदर्शनीय सामना... लिओनेल मेस्सीच्या मुंबई दौऱ्याचे अपडेट्स एका क्लिकवर

Tips For JEE Main Preparation: 12वी बोर्ड परीक्षेसोबत JEE Main ची तयारी कशी करावी? जाणून घ्या एक्सपर्टकडून

Latest Marathi News Live Update: १९ वर्षांखालील आशिया कप स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला सुरुवात

Viral Video: खरा तो एकची धर्म ! महिलेने स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी सकाळी केलं असं काही... नेटकऱ्यांकडून होतेय प्रशंसा

IPL 2026 Auction पूर्वी मोठा 'खेला'! जो ऑलराऊंडर सर्वात महागडा ठरू शकतो, त्याची फक्त फलंदाज म्हणून नोंदणी; कुणी केला गेम?

SCROLL FOR NEXT